Join us  

टीम इंडिया अन् झिम्बाब्वे यांनी मिळून १३२ वर्षानंतर कसोटीत केला पराक्रम; जाणून घ्या काय आहे हा विक्रम

By स्वदेश घाणेकर | Published: March 04, 2021 9:49 AM

Open in App
1 / 10

झिम्बाब्वे संघानंही दुबईत खेळवण्यात आलेली अफगाणिस्तान विरुद्धची कसोटी लढत दोन दिवसांत जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. लालचंद राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वेनं हा सामना १० विकेट्स राखून जिंकला.

2 / 10

झिम्बाब्वेच्या या विजयानं टीम इंडियानं संयुक्तपणे कसोटीच्या १३२ वर्षांच्या इतिहासातील वेगळा विक्रम नावावर केला.

3 / 10

अफगाणिस्तानचा पहिला डाव १३१ धावांवर गुंडाळण्यात झिम्बाब्वेला यश आलं. ब्लेसिंग मुझाराबानी ( ४ विकेट्स), विक्टर एनयाऊची ( ३ ) यांनी अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले.

4 / 10

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेनं पहिल्या डावात २५० धावा केल्या. कर्णधार सिन विलियम्सनं १०५ धावांची खेळी केली.

5 / 10

दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानच्या फलंदाजांना फार कमाल दाखवता आली नाही. इब्राहिम झाद्रान ( ७६) वगळता अन्य फलंदाजांनी नांग्या टाकल्या.

6 / 10

विक्टर एनयाऊची व डोनाल्ड तिरीपानो यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ब्लेसिंगनं २ विकेट्स घेतल्या आणि अफगाणिस्तानचा दुसरा डाव १३५ धावांवर गडगडला.

7 / 10

झिम्बाब्वेनं १७ धावांचे माफक लक्ष्य ३.२ षटकांत पार करत विजय मिळवला. दोन दिवसांत कसोटीचा निकाल लागला.

8 / 10

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग दोन कसोटींचा निकाल दोन दिवसांत लागण्याची ही १३२ वर्षांनंतरची पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी १८८९मध्ये दक्षिण आफ्रिका-इंग्लंड यांच्यातील सलग दोन कसोटी सामने दोन दिवसांत संपले होते.

9 / 10

२००२नंतर प्रथमच आशियाई खंडात बाहेरच्या संघाला दोन दिवसांत कसोटी जिंकता आली. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं शारजाह येथे पाकिस्तानवर असा विजय मिळवला होता.

10 / 10

१८८२ ते १८९६ या कालावधीत ९ सामने दोन दिवसांत संपले. त्यानंतर १९१२ ते १९४६ या काळात दोन दिवसांत कसोटीचा निकाल लागणाऱ्या सामन्यांची संख्या ६ होती, तर २००० ते २०२१ या कालावधीत ती संख्या ८ झालीय.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडझिम्बाब्वेअफगाणिस्तान