Join us  

T20 World Cup 2021 नंतर टीम इंडिया नेमकं काय करणार? BCCI चा जबरदस्त प्लान तयार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 6:37 PM

Open in App
1 / 10

T20 World Cup 2021: भारतीय संघ १४ नोव्हेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) होत असलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात आणखी एक टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) तयारीला सुरुवात केली आहे.

2 / 10

भारतीय संघातील खेळाडूंना जास्तीत जास्त टी-२० सामन्यांचा सराव देण्यासाठी बीसीसीआयनं मेगा प्लान आखला आहे. पुढील वर्षभरात भारतीय संघाच्या नियोजित दौऱ्यांमध्ये टी-२० सामन्यांना जास्तीत जास्त भरणा असणार आहे.

3 / 10

टी-२० वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर बीसीसीआयनं भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय मालिकांचं नियोजन केलं आहे. यात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे. या दौऱ्यांमध्ये जास्तीत जास्त टी-२० सामन्यांचा समावेश असणार आहे.

4 / 10

एका हिंदी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयची नुकतीच एक ऑनलाइन बैठक पार पडली. यात भारतीय संघाच्या आगामी मालिकांबाबतचा निर्णय घेण्यात आला. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२०, दोन कसोटी सामने खेळणार आहे.

5 / 10

वेस्ट इंडिज विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळविण्यात येणार आहेत. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

6 / 10

भारतात तब्बल २१ आंतरराष्ट्रीय सामने निर्धारित करण्यात आलेल्या नियोजनानुसार भारत आगामी काळात देशांतर्गत तब्बल २१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यात १४ टी-२० सामन्यांचा समावेश असणार आहे. तर तीन वनडे आणि चार कसोटी सामन्यांचा समावेश आहे.

7 / 10

भारतानं यंदाच्या वर्षात फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध मालिका खेळली होती. त्यानंतर आयपीएलला सुरुवात झाली होती. पण कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यावरच स्थगित करावी लागली होती. आता उर्वरित सामने आजपासून यूएईमध्ये खेळवले जात आहेत.

8 / 10

टी-२० वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे होतं. पण देशात कोरोना प्रादुर्भावामुळे वर्ल्डकप स्पर्धा यूएईमध्ये खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

9 / 10

टी-२० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा संघ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यात भारत टी-२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या मालिकेचं आयोजन केलं जाणार आहे.

10 / 10

आफ्रिकेतून परतल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर श्रीलंका देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. १८ मार्च रोजी हे दोन्ही दौरं संपणार आहेत. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात आयपीएलचं आयोजन होणार आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App