आयपीएलच्या आठराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ट्रॉफी जिंकून तब्बल १८ वर्षांचा दुष्काळ संपवला. तर, पंजाब किंग्जला अजूनही आयपीएलची पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. या सामन्यात पंजाबकडून खेळणाऱ्या युजवेंद्र चहलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. आयपीएलमध्ये युजवेंद्र चहल ज्या संघाकडून अंतिम सामना खेळला आहे, त्या संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये युजवेंद्र चहलला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. शिवाय, फिटनेसच्या समस्यांमुळे त्याला काही सामन्यांमधून बाहेर पडावे लागले. आता त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. युझवेंद्र चहलने आयपीएलच्या इतिहासात वेगवेगळ्या संघांसोबत एकूण तीन वेळा अंतिम सामना खेळला. या तिन्ही सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला.
आयपीएल २०१६ च्या हंगामात युजवेंद्र चहल आरसीबीकडून पहिल्यांदा अंतिम सामना खेळला. आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्यानंतर काल त्याने पंजाबकडून त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा अंतिम सामना खेळला. या तिन्ही सामन्यात त्याच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला.
युजवेंद्र चहलची कामगिरी
आयपीएल २०२५ मध्ये युझवेंद्र चहलने एकूण १४ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने २६.८७ च्या सरासरीने एकूण १६ विकेट्स घेतल्या. या हंगामात हॅटट्रिक घेण्याचा पराक्रमही चहलने केला. आरसीबीविरुद्धच्या अंतिम सामन्यात चहलने एक विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने पियुष चावलाच्या खास विक्रमाशी बरोबरी साधली. भारतात टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजामध्ये पियुष चावलासोबत युजवेंद्र चहल संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.
Web Title: Yuzvendra Chahal registers unwanted record after Punjab Kings lose to RCB in IPL 2025 final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.