Join us  

WTC Final 2021 IND vs NZ : रोहित, विराट अन् रिषभ यांच्या विकेट घेत कायले जेमिन्सननं रचला इतिहास, मोडला 72 वर्षांपूर्वीचा विक्रम

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात निराशाजन राहिली. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही अर्धा तास उशीरानं सुरू झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 5:37 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात निराशाजन राहिली. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही अर्धा तास उशीरानं सुरू झाला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनं दिवसाच्या चौथ्याच षटकात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला माघारी पाठवले. त्यानंतर टीम इंडियाला तीन आणखी मोठे धक्के बसले. न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सननं रोहित, विराट व रिषभ पंत या मोठ्या विकेट्स घेत भारताला हादरे दिले. त्यानं या सामन्यात 72 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

विराट कोहलीच्या सहकाऱ्यानं केला घात, टीम इंडियाला बसला मोठा धक्का  

आयपीएलमध्ये RCBकडून खेळणाऱ्या कायले जेमिन्सननं टीम इंडियाला हा धक्का दिला. त्यानं विराटला 44 धावांवर पायचीत केलं अन् टीम इंडियाला कालच्या धावसंख्येत 3 धावांचीच भर घालता आली आहे. विराटनं DRS घेतला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जेमिन्सननं कंजूस गोलंदाजी कायम राखताना रिषभ पंतवर दडपण निर्माण केलं. त्याला 22 चेंडूंत 4 धावाच करता आल्या. जेमिन्सनच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा रिषभचा प्रयत्न फसला अन् स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टॉम लॅथमनं सुरेख झेल टिपला.  WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today

अम्पायरनं केली चिटिंग, न्यूझीलंडचा DRS वाचवला; विराट कोहलीनं कडक शब्दात जाब विचारला

न्यूझीलंडकडून पहिल्या 8 कसोटी सामन्यांत सर्वाधिक 42* विकेट्स घेण्याचा विक्रम जेमिन्सननं नावावर केला. त्यानं जॅक कोवी ( 1937-1949) यांचा 41 विकेट्सचा विक्रम मोडला. त्यानंतर शेन बाँड ( 38), डॉज ब्रेसवेल ( 33) व हेडली होवर्थ ( 32) यांचा क्रमांक येतो. अजिंक्य रहाणेकडून अपेक्षा होत्या, परंतु घातकी फटका मारून तो 49 धावांवर माघारी परतला. आर अश्विननं फटाफट 22 धावा केल्या, परंतु तोही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतानं 7 विकेट्स गमावत 211 धावा केल्या आहेत.  दरम्यान, रोहित शर्मा व शुबमन गिल यांची टीम इंडियाला साजेशी सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. रोहित ( 34) व शुबमन ( 28) यांची 62 धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विराट व पुजारा यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाचा डाव सावरला होता. पूजारानं  54 चेंडूंत दोन चौकारांसह 8 धावा केल्या. पुजारा व विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 95 चेंडूंत 25 धावांची भागीदारी केली.  विराट व अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना दुसऱ्या दिवशी भारताची धावसंख्या 3 बाद 146 धावांपर्यंत नेली. विराट कोहली 44, तर अजिंक्य रहाणे 29 धावांवर खेळत होते. भारतीय फलंदाजांनी 64.4 षटकांत 2.25च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड