विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स ही आयपीएलमधील हिट जोडी आहे. RCB च्या ताफ्यातून खेळताना ही जोडी जमली अन् मग मैदानाबाहेरही त्यांची मैत्री हिट ठरली. पण दोघांच्या मैत्रीत एक काळ असाही आला ज्यावेळी एका कारणामुळे दोघांच्यात दरी निर्माण झाली होती. एबी डिविलियर्सवर राग मनात धरून विराट कोहलीनं त्याच्यासोबत बोलणंच बंद केले होते. हा किस्सा खुद्द एबी डिव्हिलियर्सनंच शेअर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ती गोष्ट शेअर केल्यामुळं विराटला आला होता एबी डिव्हिलियर्सचा राग
विराट कोहलीनं मागच्या वर्षी वैयक्तिक कारणास्तवर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. या निर्णयानंतर काही क्रिकेट चाहत्यांनी कोहलीला ट्रोलही केले. यावेळी एबी डिविलियर्सनं आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना कोहली कसोटी मालिकेतून दूर राहण्यामागचं कारण सांगितले होते. विराटची पत्नी अनुष्का दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याची गोष्ट शेअर केली. जी विराट कोहलीला जाम खटकली होती.
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
मी चुकून ती गोष्ट शेअर केली अन्... विराटसंदर्भात नेमकं काय म्हणाला एबी?
एबी डिव्हिलियर्सनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विराट कोहलीनं अबोला धरल्याचा किस्सा शेअर केला. तो म्हणाला आहे की, मागच्या ६ महिन्यांपासून विराट कोहली पुन्हा संपर्कात आला. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. मी ज्यावेळी त्याच्या दुसऱ्या अपत्यासंदर्भातील गोष्ट चुकून शेअर केली अन् तो नाराज झाला. त्याने माझ्याशी बोलणेच बंद केले होते.
ऑल इज वेल
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लोकप्रिय कपल आहे. दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सार्वजनिक होणार नाहीत त्याची खबरदारी घेतात. मुलांच्यासंदर्भात दोघे अधिक काळजी घेतात. मुलगी वामिकासह मुलगा अकायला त्यांनी लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे. विराट अनुष्काने दुसऱ्या बाळासंदर्भातील जी गोष्ट लपवली होती ती नकळतपणे एबी डिव्हिलियर्सनं जगजाहीर केल्यावर विराटला एबीवरही राग काढला. पण आता दोघांच्यात सर्वकाही पहिल्यासारखे आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात RCB नं फायनल गाठली अन् पहिल्यांदा जेतेपदही पटकावले. यावेळी एबी आणि विराट यांच्यातील घट्ट मैत्रीची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली होती.