Join us

IND vs SL: विराटऐवजी 'या' खेळाडूला तिसऱ्या नंबरवर संधी दे, माजी प्रशिक्षकाचा रोहितला सल्ला

गेल्या 2 वर्षांपासून विराटऩे कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले नाही, शिवाय त्याने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपदही गमावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 19:53 IST

Open in App

जेव्हा जेव्हा जगातील महान फलंदाजांचा विषय निघतो, तेव्हा विराट कोहलीचे नाव घेतले जाते. विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे, पण गेली 2 वर्षे विराटसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाहीत. नोव्हेंबर 2019 पासून विराटने कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेले नाही. त्याने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपदही गमावले असून आता विराटला संघात स्थान मिळणार की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता याच दरम्यान एका माजी खेळाडूने विराटऐवजी दुसऱ्या फलंदाजाला संधी देण्याचा आग्रह धरला आहे.

विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग नाही. विराटला विश्रांती देण्यात आली असून, त्याचा फायदा उर्वरित फलंदाज घेत आहेत. विराटच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. हे पाहून भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी श्रेयसला भविष्यातही या जागेवर संधी देण्याचा आग्रह धरला आहे.

श्रेयस अय्यरची धडाकेबाज फलंदाजीश्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20I मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करताना 57 धावांची नाबाद खेळी केली. यात श्रेयसने 5 चौकार आणि 2 षटकारही मारले. या डावात श्रेयसने केवळ 28 चेंडूंचा सामना करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

श्रेयसची टी-20 कारकीर्द अशीच आहेT20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराट अशा फलंदाजांपैकी एक आहे ज्याची सरासरी 50 च्या वर आहे. विराटने एकूण 97 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 51.50 च्या सरासरीने 3296 धावा केल्या आहेत. विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 30 अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने आतापर्यंत केवळ 34 सामने खेळले आहेत, ज्यात श्रेयसने 30.09 च्या सरासरीने 662 धावा केल्या आहेत.

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्माऑफ द फिल्ड
Open in App