Join us

रोहित-विराटच्या जीवावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची 'छप्पर फाड' कमाई!

भारतीय संघाचा दौरा म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटला फायदाच फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:05 IST

Open in App

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत व्यग्र असताना ऑस्ट्रेलियात विराट कोहली अन् रोहित शर्माची क्रेझ चर्चेचा विषय ठरत आहे. या दोन्ही दिग्गजांनी इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही जोडगोळी फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील मालिकेला अजून ४ महिने बाकी, पण...

भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी अजून ४ महिने बाकी असताना पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठीची सर्व तिकिटांची विक्री झाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात अधिकृतरित्या माहिती दिली आहे. कमी वेळात प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डही थक्क झाले आहे.  विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलिया दौरा कदाचित शेवटचा ठरू शकतो. कदाचित या गोष्टीमुळेही  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेसाठी अधिक उत्सुकता दिसून येत आहे.

जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा 

सिडनी आणि कॅनबरा स्टेडियम 'हाऊसफुल'

टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीला वनडे खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहण्यासाठी चाहत्यामध्ये कमालीची उत्साह दिसून येतोय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी दोन्ही संघाची घोषणा होण्याआधीच चाहत्यांनी आगामी वनडेसाठी आपली सीट बूक करून ठेवलीये. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विक्री झालेल्या तिकुटांपैकी १६ टक्के सीट्स या भारतीय फॅन्स क्लबने बूक केल्या आहेत. काही चाहत्यांनी तर  सर्वाधिक तिकीट खरेदी करण्याचा रेकॉर्डही नोंदवलाय. सिडनी आणि कॅनबरा येथील स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यांची सर्व तिकिटांची विक्री झाली आहे.

भारतीय संघाचा पाहुणचार अन् ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा फायदा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी भारतीय संघासोबतची मालिका ही नेहमीच मोठा फायदा करून देणारी असल्याचे म्हटले आहे. २०१९ च्या कोरोनाच्या काळात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला होता. २०२१ च्या भारत दौऱ्यामुळे हा तोटा भरून काढण्यात मदत झाली. एवढेच नाही तर  २०२४-२५ च्या भारत दौऱ्यातही ऑस्ट्रेलियन क्रिकेटला फायदा झाल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहली