Join us

IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

२००७ पासून द्विपक्षीय मालिका पतौडी ट्रॉफी नावाने खेळवली जात होती. पण आता इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने ही ट्रॉफी रिटायर्ड करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:36 IST

Open in App

Sunil Gavaskar on Replace Pataudi Trophy With Tendulkar-Anderson Trophy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील २० जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. ही द्विपक्षीय कसोटी मालिका आधी पतौडी ट्रॉफी स्पर्धा या नावाने ओळखली जायची. पण आता हे नाव बदलून ही स्पर्धा तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी या नावाने खेळवली जाणार आहे. ही गोष्ट भारताची माजी कसोटीपटू आणि कर्णधार सुनील गावसकर यांना खटकली आहे. त्यांनी मुद्यावर नाराजी व्यक्त केलीये. २००७ पासून द्विपक्षीय मालिका पतौडी ट्रॉफी नावाने खेळवली जात होती. पण आता इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने ही ट्रॉफी रिटायर्ड करण्याचा निर्णय घेतला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गावसकरांना पटला नाही ECB चा हा निर्णय म्हणाले...

लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स्टारसाठी लिहिलेल्या स्तंभलेखाच्या माध्यमातून भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेत विजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीच्या बदलासंदर्भात नाराजी व्यक्त केलीये. त्यांनी लिहिलय की, इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील विजेत्याला दिली जाणारी पतौडी ट्रॉफी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी अस्वस्थ करणारी आहे. क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल की, व्यक्तिगत नाव दिलेली ट्रॉफी हटवण्यात येणार आहे. हा निर्णय ECB चा असून याची माहिती कदाचित बीसीसीआयलाही देण्यात आली असेल. हा निर्णय पतौडी कुटुंबियांचे भारत आणि इंग्लंड क्रिकेटमधील योगदानाप्रती असंवेदनशीलता दर्शवते, असा उल्लेखही गावसकरांनी केला आहे. 

IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना

भारत-इंग्लंड दोन्ही संघाकडून खेळलेल्या दिग्गजाचे नावाने कधीपासून दिली जायची ही ट्रॉफी? 

पतौडी कुटंबियातील दिग्गज क्रिकेटर इफ्तिखार अली खान यांच्या क्रिकेटमधील खास योगदानामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील ट्रॉफीला पतौडी ट्रॉफी असे नाव देण्यात आले होते. इफ्तिखार अली खान पतौडी हे एकमेव असे क्रिकेटर आहेत ज्यांनी इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघाकडून कसोटी खेळली आहे. १९३२-३३ च्या बॉडीलाइन मालिकेत ते इंग्लंडच्या संघाचा भाग होते.  डिसेंबर १९३२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या या दिग्गजाने १७-२० ऑगस्ट १९४६ मध्ये भारताकडून इंग्लंड विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारत विरूद्ध इंग्लंड २०२५सचिन तेंडुलकरसुनील गावसकर