Join us  

"आम्ही आणखी ३०-४० धावा करायला हव्या होत्या", पराभवानंतर रोहितने गोलंदाजांवरही फोडलं खापर

ipl 2023, rcb vs mi : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 2:10 PM

Open in App

rohit sharma ipl mathces against rcb । बंगळुरू : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मोठा विजय मिळवत विजयी सलामी दिली. काल आयपीएलचा पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी अप्रतिम खेळ दाखवत सामना आपल्या नावावर केला. खरं तर आरसीबीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७१ धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांसमोर कोणत्याच मुंबईच्या फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता.  पण तिलक वर्माने मुंबईची लाज वाजवली अन् ४६ चेंडूत नाबाद ८४ धावा कुटल्या. वर्माच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीसमोर १७२ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात विराट-डू प्लेसिसच्या जोडीने १७२ धावांचे आव्हान सहज गाठले आणि विजयी सलामी दिली. सलामीच्या सामन्यात झालेल्या दारूण पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठे विधान केले आहे. रोहितने संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत म्हटले, "पहिल्या ६ षटकांत आमची फलंदाजी चांगली झाली नाही. पण तिलक वर्माने खूप चांगली खेळी करून डाव सावरला. तो सकारात्मक असून त्याच्यात खूप क्षमता आहे. काही शॉर्ट्स तर त्याने फारच शानदार खेळले. त्याच्यामुळेच आम्ही एवढी धावसंख्या उभारू शकलो." रोहितने म्हटले... "ही खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप अनुकूल होती. पण आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही. कदाचित आम्हाला आणखी ३०-४० धावा करायला हव्या होत्या. गोलंदाजीत देखील आमच्याकडून काही चुका झाल्या, ज्यामुळे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले", असे रोहितने आणखी सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलमध्ये सलग ११ वेळा मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या सलामीच्या सामन्यात पराभूत झाला आहे. याशिवाय मागील सहा सामन्यांमध्ये आरसीबीविरूद्ध मुंबईचा पाचव्यांदा पराभव झाला आहे.  RCBची विजयी सलामीमुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून आरसीबीने विजयी सलामी दिली आहे. मुंबईला १७१ धावांवर रोखल्यानंतर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने अप्रतिम कामगिरी करून विजय साकारला. विराटने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला. तर कर्णधार डू प्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेर आरसीबीने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी आणि २२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :मुंबई इंडियन्सरोहित शर्माआयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरजोफ्रा आर्चर
Open in App