Join us

IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार

श्रेयस अय्यरची विकेट हाती लागली तिथं सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूनं फिरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 23:32 IST

Open in App

IPL Final RCB Beats vs PBKS And Wins Maiden Trophy :  रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने  १८ व्या हंगामातील फायनल जिंकत जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर इतिहास रचला आहे. टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना विराट कोहलीच्या ३५ चेंडूतील ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरुच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १९० धावा करत पंजाबच्या संघासमोर १९१ धावांचे टार्गेट सेट केले होते.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

श्रेयस अय्यरची विकेट पडली तिथं RCB संघ मॅचमध्या आला अन्...

या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने दमदार सुरुवात केली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग जोडीनं पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर पंजाबच्या संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. श्रेयस अय्यरची विकेट हाती लागली तिथं सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूनं फिरला. या विकेटनंतर RCB संघाने सामन्यावरील आपली पकड हळूहळू मजबूत केली. अखेरच्या षटकात शशांक सिंहने काही उत्तुंग फटके मारले. पण एक बिग हिट कमी पडला अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ६ धावांनी सामना जिंकत पहिल्या वहिल्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. विकेट मिळाल्यावर  आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करणाऱ्या विराट कोहलीसाठी हा विजय खूपच भावनिक होता. त्यामुळेच विजय दृष्टिक्षेपात येताच क्षेत्ररक्षण करतावेळीच त्याला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. 

 १८ वर्षांतील चौथ्या प्रयत्न यशस्वी; रजत पाटीदारनं  १८ क्रमांकाच्या जर्सीत मिरवणाऱ्या विराटचं स्वप्न केलं साकार

मागील १७ वर्षांत आरसीबीच्या संघाने ३ वेळा फायनल गाठली. पण तिन्ही वेळी धावांचा पाठलाग करताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला अन् ट्रॉफी जिंकण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. चौथ्या प्रयत्नात रजत पाटीदार या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने विराट स्वप्न साकार केलं. १८ वर्षे १८ क्रमांकाच्या जर्सीत रुबाबात मिरवणाऱ्या विराट कोहलीसाठी ट्रॉफी जिंकायचीये, हे कॅप्टनने आधीच बोलून दाखवलं होते. हा शब्द खरा ठरवत रजत पाटीदार RCB ला अच्छे दिन दाखवणारा कॅप्टन ठरला आहे.पंजाबच्या पदरी निराशा

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जचा संघही पहिली वहिली ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरला होता. नाणेफेक जिंकून त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करताना आरसीबीला १९० धावांत रोखले. या धावांचा पाठलाग करताना संघाने चांगली सुरुवात केली. पण शेवटी त्यांच्या पदरी निराशाच आली.  रोमारियो शेफर्ड याने श्रेयस अय्यरची विकेट घेतल्यावर पंजाबचा संघ बॅकफूटवर गेला. ही विकेट एवढी महत्त्वपूर्ण होती की, अख्खा संघच ढळला. त्यात क्रुणाल पांड्यानं डाव साधला. त्याने ४ षटकात १७ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या अन् सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली. अनुभवी भुवीच्या खात्यातही २ विकेट्स जमा झाल्या. याशिवाय यश दयाल आणि जोश हेजलवूड यांनी आरसीबीकडून प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.  

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्स