Join us

IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?

IPL 2025 Final, Eden Gardens Controversy: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर आजपासून पुन्हा सुरू होतेय IPL स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:48 IST

Open in App

IPL 2025 Final, Eden Gardens Controversy: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर, आयपीएल २०२५ शनिवारपासून म्हणजेच १७ मे पासून पुन्हा सुरू होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. हा सामना बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी टॉप ७ संघांचा प्रत्येक सामना 'करो वा मरो' असाच असणार आहे. सर्व संघांनी यासाठी तयारी केली आहे, पण यादरम्यान बीसीसीआयसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका निर्णयामुळे कोलकाताचे क्रिकेट चाहते खूप संतापले आहेत. शुक्रवारी (१६ मे) त्यांनी ईडन गार्डन्सबाहेर निदर्शने केली.

चाहत्यांनी का केला निषेध?

IPL 2025 चा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे होणार होता, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे ही लीग एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली. आता ते शनिवार (१७ मे) पासून पुन्हा सुरू होत आहे, परंतु आता असा अंदाज लावला जात आहे की अंतिम सामना कोलकातामध्ये होणार नाही. याबद्दल कोलकाता क्रिकेट चाहते खूप संतापले आहेत. १६ मे रोजी त्यांनी ईडन गार्डन्स स्टेडियमबाहेर जोरदार निदर्शने केली. त्यांनी सांगितले की, या हंगामाचा अंतिम सामना त्याच ठिकाणी व्हावा, जिथे आधी निर्णय झाला होता. आंदोलकांनी बीसीसीआयला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. या निदर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

IPL 2025ची फायनल अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता

IPL 2025चा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता, जो आता ३ जून रोजी खेळवला जाईल. याशिवाय, आता विजेतेपदाचा सामना कोलकाताऐवजी अहमदाबादमध्ये होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची या हंगामातील क्वालिफायर २ आणि अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही सामने १ आणि ३ जून रोजी खेळवले जातील.

ऑपरेशन सिंदूरनंतर स्पर्धा केली होती स्थगित

ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे ही लीग एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. यानंतर, १२ मे रोजी दोन्ही देशांमधील युद्धविरामानंतर बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, आता अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. तथापि, अंतिम सामना कुठे होईल याबद्दल अद्याप कोणतेही ठिकाण निश्चित झालेले नाही.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५ऑफ द फिल्डबीसीसीआय