Rajat Patidar First RCB Captain To Win The IPL Trophy : अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने 'हारसीबी'चा टॅग पुसून काढत अखेर पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. फाफ ड्युप्लेसिसला नारळ दिल्यावर आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने रजत पाटीदारच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली होती. मध्यप्रदेशच्या या क्रिकेटरनं विराट कोहलीसह ३ दिग्गजांना जे जमलं नाही ती गोष्ट IPL मध्ये पहिल्यांदाच कॅप्टन्सी करताना करून दाखवली. १८ व्या वर्षी आरसीबीनं चौथ्या प्रयत्नात हे यश मिळवले असले तरी रजत पाटीदारचं हे पदार्पणातील यश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रजत पाटीदारला लागला होता 'अनसोल्ड'चा टॅग, मग RCB नं दिला होता भाव
रजत पाटीदार याने २०२१ च्या हंगामात आरसीबीच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०२२ च्या हंगामासाठी झालेल्या लिलावात तो अनसोल्ड राहिला होता. इंज्युरी रिप्लेसमेंटच्या रुपात RCB नं आपल्या जुन्या गड्यावर भरवसा दाखवला. संघाचा विश्वास सार्थ ठरवत त्याने २०२२ ते २०२४ या हंगामात लक्षवेधी कामगिरी करून त्याने संघातील आपली जागा आणखी भक्कम केली. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी आरसीबीच्या संघाने फक्त ३ खेळाडूंना कायम केले होते. यात विराट कोहली, यश दयालसोबत रजत पाटीदारचा समावेश होता. ११ कोटीसह संघात कायम ठेवल्यावर त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. हा डाव अखेर यशस्वी ठरला.
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
श्रेयस अय्यरचा हिशोब केला चुकता
रजत पाटीदार याला काही असेच कॅप्टन केले नव्हते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व करताना आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली होती. गतवर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेशचा संघ फायनल खेळला होता. यावेळी मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यर त्याच्यासमोर भारी ठरलेला. पण RCB चं नेतृत्व करताना सात महिन्यांनी रजतनं अय्यरचा हिशोब चुकता करत RCB ला 'सुवर्ण' मिळवून दिले आहे.
विराटसह या दिग्गजांच्या पदरी आली होती निराशा
आयपीएल २००९ च्या हंगामात जम्बो अनिल कुंबळे या दिग्गजाच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ फायनलपर्यंत पोहचला होता. पण डेक्कन चार्जर्स संघासमोर आरसीबीचा निभाव लागला नाही. २०११ मध्ये न्यूझीलंडचा स्टार डेनियल व्हिक्टोरीच्या नेतृत्वाखाली आरसीबीनं दुसऱ्यांदा फायनल गाठली त्याने धोनीचा CSK संघ RCB च्या ट्रॉफी आड आला. २०१६ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाल सनरायझर्स हैदराबादनं पराभवाचा दणका दिला होता. त्यानंतर ९ वर्षांनी रजतच्या नेतृत्वाखाली आरसीबीनं 'सुवर्ण' संधी साधलीये.