Join us  

RCB turn Blue IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'रंग' बदलला; Mumbai Indians ना मस्का मारण्यासाठी पाठवलं पत्र, पण का?

IPL 2022 मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी लढत आहे, तर उद्या पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना होणार आहे. पण, आजच्या MI vs DC सामन्याला अधिक महत्त्व आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 3:47 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ च्या साखळी फेरीचे आता दोनच सामने शिल्लक आहेत. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी लढत आहे, तर उद्या पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना होणार आहे. पण, आजच्या MI vs DC सामन्याला अधिक महत्त्व आहे. आयपीएल २०२२च्या प्ले ऑफच्या तीन जागा निश्चित झाल्या आहेत आणि आजच्या लढतीतून चौथा संघ ठरणार आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर फेकले गेले असले तरी आजची लढत ही व्ह्यूअर्सशिपच्या बाबतीत रिकॉर्ड ब्रेक करणारी ठरली तर आश्चर्य वाटायला नको. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Banglore) सपोर्ट हा रोहित शर्माच्या MI ला असणार आहे आणि त्यामुळेच RCB कडून मस्का मारण्याचं काम सुरू आहे.

आयपीएल २०२२मध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने सर्वाधिक १० विजय मिळवून २० गुणांसह सर्वप्रथम प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले. त्यापाठोपाठ आणखी एक नवीन संघ लखनौ सुपर जायंट्स ( १८) प्ले ऑफमध्ये धडकला. काल राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवून नुसते प्ले ऑफमधील स्थान पक्के केले नाही, तर त्यांनी थेट LSGला मागे टाकून क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की केली. त्यामुळे २४ मे रोजी कोलकाताच्या इडन गार्डवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( GT vs RR Qualifier 1) असा सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात १४ गुण आहेत. दिल्लीचा एक सामना बाकी असल्याने तेही प्ले ऑफच्या चौथ्या स्थानाच्या शर्यतीत आहेत.

RCBचा मुंबईला मस्का कशासाठी?अखेरच्या साखळी सामन्यात RCB ने गुजरात टायटन्सला पराभूत करून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले. आरसीबीच्या विजयामुळे मात्र पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांचे आव्हान संपुष्टात आले. आता आज मुंबई विरुद्ध दिल्ली असा सामना आहे आणि त्यात आम्ही मुंबईला सपोर्ट करणार हे  RCBचा कर्णधार फॅफ ड्यू  प्लेसिस व विराट कोहली यांनी आधीच स्पष्ट केले होते. मुंबईने आज दिल्लीला हरवल्यास RCBचा प्ले ऑफचा मार्ग निश्चित होईल. पण, जर दिल्ली जिंकल्यास समान गुण असूनही उत्तम नेट रन रेटच्या जोरावर रिषभ पंतचा संघ प्ले ऑफमध्ये जाईल. RCB चा नेट रन रेट हा -0.253 असा आहे, तर दिल्लीचा 0.255 आहे. त्यामुळे दिल्लीचा पराभव हा RCB साठी महत्त्वाचा आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App