Join us

IPL 2019 : RCBच्या विजयावर खवय्यांच्या पैजा; नशिबाने उपासमारीची वेळ टळली

कोहलीच्या संघाच्या सततच्या पराभवावर आता सोशल मीडियावर खवय्यांच्या पैजा लागू लागल्या आहेत. RCB जिंकावा म्हणून दर्दी खवय्ये आपल्या सर्वात आवडत्या पदार्थाचा महिनाभरासाठी त्याग करायलाही तयार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 10:59 IST

Open in App
ठळक मुद्देकोहलीच्या संघाच्या सततच्या पराभवावर आता सोशल मीडियावर खवय्यांच्या पैजा लागू लागल्या आहेत.RCB जिंकावा म्हणून दर्दी खवय्ये आपल्या सर्वात आवडत्या पदार्थाचा महिनाभरासाठी त्याग करायलाही तयार आहेत. RCB जिंकल्यास महिनाभर पावभाजी,पाणी पूरी, पिझ्झा, मोमोज आदी पदार्थ खाणार नसल्याच्या या पैजा होत्या.

बंगळूरू, आयपीएल 2019 : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पाहत आहे. त्याच्या चाहत्यांचा असा दावा आहे की कोहलीने फक्त इंग्लंडमध्ये जाऊन वर्ल्ड कप आणायचा आहे. पण वर्ल्ड कप पूर्वीच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आणि आता इंडियन प्रीमिअर लीगमध्येही कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघावर सलग सहा सामन्यांत पराभवाची नामुष्की ओढवली आहे. वर्ल्ड कप मोहीम आणि आयपीएल याची तुलना योग्य नव्हे, परंतु आयपीएलमध्ये कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोहलीच्या संघाच्या सततच्या पराभवावर आता सोशल मीडियावर खवय्यांच्या पैजा लागू लागल्या आहेत. RCB जिंकावा म्हणून दर्दी खवय्ये आपल्या सर्वात आवडत्या पदार्थाचा महिनाभरासाठी त्याग करायलाही तयार आहेत. बंगळूरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यापूर्वी अनेक खवय्यांनी RCB च्या विजयावर पैजा लावल्या. RCB जिंकल्यास महिनाभर पावभाजी, पाणी पूरी, पिझ्झा, मोमोज आदी पदार्थ खाणार नसल्याच्या या पैजा होत्या. आता या RCB च्या समर्थनात होत्या की कोहलीच्या नेतृत्वावर ( पराभूत होणार) असलेल्या विश्वासावर होत्या, देव जाणे. पण, बंगळूरू आणि दिल्ली यांच्या सामन्यातील निकालानंतर खवय्यांवरील उपासमारीची वेळ नक्की टळली. दिल्लीने चार विकेट राखून हा सामना जिंकला. 

श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर खेळाडूंनी  बंगळुरू संघाचे बारा वाजवले. या जोडीने दमदार फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला 4 विकेट राखून विजय मिळवून दिला. बंगळुरूचा हा सलग सहावा पराभव ठरल्याने प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. 149 धावांचा पाठलाग करताना पृथ्वीने 28, तर अय्यरने 67 धावांची खेळी केली. दिल्लीने हे लक्ष्य 18.5 षटकांत पूर्ण केले.

 

टॅग्स :आयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीदिल्ली कॅपिटल्स