India vs South Africa, 3rd Test : बारा वर्षानंतर घडला पराक्रम, रोहित-अजिंक्य या मुंबईकर जोडीनं केला विक्रम

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार रोहित शर्मानं ठोकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 10:35 AM2019-10-20T10:35:41+5:302019-10-20T10:36:08+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 3rd Test :  After 2007 two Mumbai batsmen scored a century in the same Test innings for India | India vs South Africa, 3rd Test : बारा वर्षानंतर घडला पराक्रम, रोहित-अजिंक्य या मुंबईकर जोडीनं केला विक्रम

India vs South Africa, 3rd Test : बारा वर्षानंतर घडला पराक्रम, रोहित-अजिंक्य या मुंबईकर जोडीनं केला विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार रोहित शर्मानं ठोकला. रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहित 164 चेंडूंत 14 चौकार व 4 षटकार खेचून 117, तर अजिंक्य 135 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 83 धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी 3 बाद 224 धावा केल्या होत्या. त्यात दुसऱ्या दिवशी ते आणखी भर घालत आहेत. दरम्यान या जोडीनं 12 वर्षांनंतर एक पराक्रम करून दाखवला. 

रोहित - अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी नोंदवली. टीम इंडिया 3 बाद 39 अशा अवस्थेत असताना चौथ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी करण्याचा विक्रम मोहम्मद अझरुद्दीन आणि मोइंदर अमरनाथ ( 190 वि. इंग्लंड, 1985) यांच्या नावावर होता. तो विक्रम आज रोहित व अजिंक्यनं मोडला. रोहित शर्मानंतर कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्यनं कसोटीत शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 11 वे शतक ठरले. विशेष म्हणजे रहाणेनं सर्वाधिक 3 शतकं ही आफ्रिकेविरुद्ध झळकावली आहेत. त्यानंतर न्यूझीलंड (2), श्रीलंका (2),  वेस्ट इंडिज (2), ऑस्ट्रेलिया (1) आणि इंग्लंड (1) यांचा क्रमांक येतो. 

एकाच सामन्यात मुंबईच्या दोन फलंदाजांना शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2007मध्ये वसीम जाफर आणि सचिन तेंडुलकर यांनी बांगलादेशविरुद्ध ढाका कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर मुंबईच्या खेळाडूंचा मान रोहित व अजिंक्यने पटकावला. अजिंक्यनं गेल्या दोन वर्षांत भारतीय संघ अडचणीत असताना शतक झळकावले आहे. गतवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची अवस्था 3 बाद 25 अशी होती आणि तेव्हाही अजिंक्यनं शतक ठोकले होते. 

Web Title: India vs South Africa, 3rd Test :  After 2007 two Mumbai batsmen scored a century in the same Test innings for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.