Join us  

India vs South Africa, 2nd T20 : हार्दिक पंड्या दोन महिने क्रिकेटपासून होता लांब, हे होतं कारण

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंड्याने या सामन्यात पुनरागमन केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 7:10 PM

Open in App

मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला गेले दोन महिने क्रिकेटपासून लांब होता. कारण दोन महिन्यापूर्वी हार्दिकला त्रास जाणून लागला होता. हा त्रास पाच वर्षांनंतर पंड्याला जाणवू लागला होता. त्यामुळे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंड्याने या सामन्यात पुनरागमन केले आहे.

पाच वर्षांपूर्वी पंड्या पाठिच्या दुखापतीने त्रस्त झाला होता. ही दुखापत त्याची पुन्हा एकदा बळावली, त्यामुळे त्याने विश्रांतीचा निर्णय घेतला होता. दुखापतीवर उपचार केल्यानंतर पंड्या आता पूर्णपणे फिट आहे.

याबाबत पंड्या म्हणाला की, " गेले दोन महिने मी क्रिकेटपासून लांब होतो. कारण माझे पाठिचे दुखणे पुन्हा एकगा सुरु झाले होते. पाच वर्षांपूर्वी मला असाच त्रास झाला होता. पण आता दुखापतीवर मी उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर फिट राहण्यासाठी बरीच तयारीही केली आहे."

 मोहालीची खेळपट्टी कशी असेल, सांगत आहेत सुनील गावस्करमोहाली येथे काही मिनिटांमध्ये दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्यातरी सामन्यावर पावसाचे सावट दिसत नाही. पण मोहालीची खेळपट्टी असेल तरी कशी, याबाबत भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मोहालीच्या खेळपट्टीबाबत गावस्कर म्हणाले की, " खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे चेंडू बॅटवर सहजपणे येईल. पण जसा चेंडू जुना होत जाईल तसा तो बॅटवर थोड्या उशिराने येईल. खेळपट्टीवर काही काळे डाग आहेत, त्यामुळे कालांतराने चेंडू संथगतीने येईल."

दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात पाऊस कधी पडणार, जाणून घ्या...भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज दुसरा ट्वेन्टी-20 सामना रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

 दोन्ही संघ या सामन्यात विजयासह तीन लढतींच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी ही लढत महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला संधीचा लाभ घेण्यात अपयश आले. त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण वाढत आहे. उभय देशांमध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारताने 13पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेला 5 सामने जिंकता आले आहेत.

मोहाली येथील सामना सुरु झाल्यावर अर्ध्या किंवा एका तासाने पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये पावसाची शक्यता फक्त 5 ते 10 टक्के वर्तवण्यात आली आहे. सामना सुरु झाल्यावर अर्ध्या तासामध्ये पावसाचे आगमन होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण हा पाऊस जोरदार नसेल, त्याचबरोबर जास्त वेळ पावसामुळे वाया जाणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आता पाऊस बाजी मारणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्याभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका