Join us  

India Vs Pakistan, World Cup 2019 : टीम इंडिया मँचेस्टरमध्ये दाखल, बीसीसीआयनं दिला Weather रिपोर्ट !

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 2:39 PM

Open in App

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. गेल्या आठवडाभरात पावसामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील चार सामने रद्द झाले आणि त्यात भारत-न्यूझीलंड सामन्याचाही समावेश होता. त्यात मँचेस्टर येथील हवामानाचा अंदाज घेतल्यास भारत-पाक सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे रविवारची जय्यत तयारी करून ठेवलेल्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ नॉटिंगहॅम येथून मँचेस्टर येथे शनिवारी दाखल झाला. 

मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर येथील खेळपट्टीसह संपूर्ण मैदान झाकून ठेवण्यात आले होते. आता 48 तास उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. आधीच दोन्ही संघांना पावसामुळे प्रत्येकी एक-एक लढतीत फटका बसला आहे. त्यात आणखी एक सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांतील खेळाडूही प्रचंड निराश होतील. हा सामना कोणत्याही परिस्थितीत खेळवण्यात यावा याकरिता ग्राऊंड स्टाफ अहोरात्र मेहनत घेत आहे. रविवारी दुपारपर्यंत तरी मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे, परंतु तुरळक सरी पडतील. त्याचा सामन्यावर परिणाम होऊ शकतो.

मँचेस्टर येथे दाखल होताच बीसीसीआयनं तेथील वातावरणाचे दर्शन घडवणारा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोनुसार ओल्ड ट्रॅफर्डवर ढगाळ वातावरण दिसत आहे.

( भारत-पाक लढतीत पाऊस पडल्यास १०० कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे?

बीसीसीआयची पाकिस्तानसमोर गुगली; आठवण करून दिली 'ही' गोष्ट!भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंही (बीसीसीआय) या लढतीवरून पाकिस्तान संघाला डिवचण्याची संधी दवडली नाही. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून पाकिस्तानला पराभवाची आठवण करून दिली आहे. भारत-पाक सामन्यापूर्वी बीसीसीआयनं 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांत झालेल्या सामन्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या सामन्यात भारतानं 76 धावांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. शिखर धवन ( 73), विराट कोहली ( 107) आणि सुरेश रैना ( 74) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 7 बाद 300 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 47 षटकांत 224 धावांत तंबूत परतला. शाहजाद अहमद ( 47), मिसबाह उल हक ( 76) व हॅरिस सोहेल ( 36) वगळता पाकच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बीसीसीआयनं या सामन्याचा व्हिडीओ शेअर करून पाकिस्तान समोर गुगली टाकली आहे.

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानभारतपाकिस्तान