Join us  

India Vs Bangladesh, Latest News : आत्ता वर्ल्ड कप भारताचाच, आज्जीबाईंचा कोहलीला आशिर्वाद, व्हिडीओ वायरल

बऱ्याचदा सदिच्छा, आशिर्वादही तुमच्या यशाचे रहस्य ठरू शकतात. असाच आशिर्वाद भारताचा कर्णधार विराट कोहलीला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 12:03 AM

Open in App

बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : एखादी गोष्ट फक्त गुणवत्तेवरच जिंकता येत नाही. बऱ्याचदा सदिच्छा, आशिर्वादही तुमच्या यशाचे रहस्य ठरू शकतात. असाच आशिर्वाद भारताचा कर्णधार विराट कोहलीला मिळाला. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या चारुलता पटेल या 87 वर्षांचा आज्जीबाई आल्या होत्या. चारुलता यांनी यावेळी कोहली आणि सामनावीर रोहित शर्माशी गप्पा मारल्या. त्याचबरोबर त्यांना आशिर्वादही दिला.

पाहा हा खास व्हिडीओ

सामनावीर रोहित शर्माने केला 'सुपर फॅन'बरोबर आनंद साजराबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावले. विश्वचषकातील त्याचे हे चौथे शतक ठरले. भारताच्या विजयात रोहितने मोलाचा वाटा उचलला आणि त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोहितने आपला आनंद यावेळी स्पेशल फॅन'बरोबर साजरा केला.

हा सामना पाहायला 87 वर्षांच्या चारुलता पटेल आल्या होत्या. चारुलता या व्हिलचेअरवरून सामना पाहायला आल्या होत्या. सामना सुरु असताना चारुलता यांनी सामन्याचा मनोसोक्त आनंद लुटला. पण सामना संपल्यावर रोहित खासकरून चारुलता यांच्याकडे गेला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. यापुढील लॉर्ड्स येथील सामना सामना पाहण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे चारुलता यांनी यावेळी सांगितले.

भारताच्या सामन्यात 'या' आज्जीबाईंनी केली फुल टू धमाल, पाहा व्हिडीओबांगलादेशवर विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पण या सामन्यात साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते एका भाराताच्या आज्जीबाईंनी. या आज्जीबाईंनी सामन्यात फुल टू धमाल केल्याचे पाहायला मिळाले. या आज्जीबाईंचे सामन्यातील व्हिडीओ चांगलेच वायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

रोहित शर्माचे शतक आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशला 28 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण या सामन्या या आज्जीबाईंनी सर्वांची मने जिंकली. भारताच्या खेळाडूंनाही या आज्जीबाईंना भेटायचा मोह आवरता आला नाही. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि या लढतीतील सामनावीर रोहित शर्मा यांनीही या आज्जीबाईंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.

या आज्जीबाई नेमक्या आहेत तरी कोण...या आज्जीबाईंचे नाव चारुलता पटेल असून त्या 87 वर्षांचा आहेत. या आज्जीबाई सामना पाहायला व्हिलचेअरवर आल्या होत्या. पण या आज्जीबाईंनी जी सामन्यात धमाल केली, तेवढा आनंद कुणालाही लुटता आला नाही.

धोनी नसताना रीव्ह्यू घेतला आणि वाया गेलाबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने एक रीव्ह्यू घेतला. पण हा रीव्ह्यू घेताना महेंद्रसिंग धोनी यष्टीरक्षण करत नव्हता. धोनी नसताना यावेळी कर्णधार विराट कोहलीने रिषभ पंतचे ऐकून रीव्ह्यू घेतला. पण हा भारताचा रीव्ह्यू वाया गेल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रीव्ह्यू न घेतल्याने जेसन रॉयला जीवदान मिळाले होते.

ही गोष्ट घडली ती 12व्या षटकात. यावेळी मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. शमीचा एक चेंडू सौम्य सरकारच्या पॅडवर आदळला. त्यावेळी शमीसह भारतीय संघाने जोरदार अपील केले. पण मैदानावरील पंचांनी यावेळी सरकारला नाबाद ठरवले. त्यावेळी कोहलीने पंतला रीव्ह्यू घ्यायचा की नाही, याबाबत विचारले. त्यावेळी मला काहीच समजले नाही, असे उत्तर पंतने दिले. पण त्यावेळी हा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचेही पंतने कोहलीला सांगतिले नाही. त्यामुळे कोहलीने रीव्ह्यू घेतला आणि यामध्ये तो नापास झाल्याचे पाहायला मिळाले.

जेसन रॉय बाद होता, पण कोहलीनं DRS घेतला नाहीजेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला सकारात्मक सुरुवात करून दिली. दुखापतीतून सावरणाऱ्या रॉयनं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, शिवाय त्याला नशीबाचीही  साथ मिळाली. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्यानं टाकलेल्या 11 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉयला जीवदान मिळालं. रॉय व बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रॉय बाद असल्याची अपील भारतीय खेळाडूंनी केली, परंतु त्यावर DRS न मागितल्याचा फटका भारताला बसला.

पांड्यानं टाकलेला चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला, परंतु त्याला छेडछाड करण्याचा मोह रॉयला आवरता आला नाही. चेंडू त्याच्या ग्लोव्हजला घासून यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हातात विसावला. धोनीनं त्वरित अपील केले, परंतु पंचांनी व्हाईडचा सिग्नल दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व पांड्या धोनीकडे आले. पण, धोनीनं DRS न घेण्यास सांगितले. त्यानंतर रिप्लेत पाहिले असता रॉय बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते, त्यामुळे DRS चा निर्णय घेतला असता तर भारताला पहिले यश मिळाले असते, असे चाहत्यांना वाटले.

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्मावर्ल्ड कप 2019भारतबांगलादेश