Join us

IND vs AUS 3rd T20 : कोहलीच्या अर्धशतकाने भारताचा दमदार विजय

या विजयासह भारताने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 16:50 IST

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे.

 

भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला असला तरी गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका भारताला बसला. त्यामुळे तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना 164 धावा करता आल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी झोकात सुरुवात केली होती. पण रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना मोठी खेळी साकारता आली नाही. हे दोघे बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी आपल्या विकेट्स ऑस्ट्रेलियाला आंदण दिल्या. पण त्यानंतर कोहलीने दमदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. कोहलीने 41 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 61 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली