श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना

गेल्या ११ टी-२० सामन्यांमधील भारताचा हा नववा विजय ठरला आहे. श्रीलंकेने भारताला शेवटचे जुलै २०२४ मध्ये दंबुला येथे पराभूत केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 05:56 IST2025-12-26T05:55:50+5:302025-12-26T05:56:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India ready for T20 series win against Sri Lanka; Third T20 match against Sri Lanka, who are struggling with poor form, today | श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना

श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना

तिरुअनंतपुरम : आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेला भारतीय संघ आपली विजयी लय कायम राखत, खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. विशाखापट्टणम येथे झालेले पहिले दोन्ही सामने अनुक्रमे ८ आणि ७ गडी राखून जिंकत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

गेल्या ११ टी-२० सामन्यांमधील भारताचा हा नववा विजय ठरला आहे. श्रीलंकेने भारताला शेवटचे जुलै २०२४ मध्ये दंबुला येथे पराभूत केले होते. यजमान भारताची फलंदाजी अत्यंत भक्कम असून, दोन्ही सामन्यांत वेगवेगळ्या खेळाडूंनी विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. पहिल्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्सने चमक दाखवली, तर दुसऱ्या सामन्यात शेफाली वर्मा विजयाची शिल्पकार ठरली. 

अचूक गोलंदाजीचा मारा 
भारताची गोलंदाजीही तितकीच प्रभावी ठरत आहे. फिरकीपटूंनी श्रीलंकेला पहिल्या सामन्यात १२१ आणि दुसऱ्या सामन्यात १२८ धावांवर रोखून धरले. युवा गोलंदाज एन. श्रीचरणी, वैष्णवी शर्मा आणि क्रांती गौड यांनी शिस्तबद्ध आणि प्रभावी मारा केला आहे. अष्टपैलू दीप्ती शर्मा तापामुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकली नव्हती. मात्र, तिच्या जागी आलेल्या स्नेह राणाने ४ षटकांत केवळ ११ धावा देत १ बळी घेतला. 

क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज 
टीम इंडियाला क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून पाच झेल सुटले होते; मात्र दुसऱ्या सामन्यात संघाने श्रीलंकेच्या तीन
खेळाडूंना धावबाद करत पुनरागमन केले. संघ पुढील तीन सामन्यांत  कामगिरीत अधिक सुधारणा करण्यास उत्सुक आहे.

स्मृती मानधनाकडून दमदार फलंदाजीची असेल अपेक्षा...

श्रीलंकेसमोर आव्हान दुसऱ्या सामन्यात चामरी अटापट्टू बाद झाल्यानंतर श्रीलंकेने अवघ्या २६ धावांत ६ गडी गमावले. दोन्ही संघांच्या कामगिरीत सध्या मोठी तफावत दिसून येत आहे.

Web Title : संघर्षरत श्रीलंका के खिलाफ भारत की टी20 सीरीज पर नजर

Web Summary : आत्मविश्वास से भरी भारतीय टीम का लक्ष्य तीसरे टी20 में श्रीलंका के खिलाफ सीरीज जीतना है। भारत पांच मैचों की श्रृंखला में 2-0 से आगे है। मजबूत बल्लेबाजी और प्रभावी गेंदबाजी अहम रही है, हालांकि क्षेत्ररक्षण में सुधार की जरूरत है। स्मृति मंधाना के प्रदर्शन का इंतजार है।

Web Title : India Eyes T20 Series Win Against Struggling Sri Lanka

Web Summary : Confident India aims for a series win against Sri Lanka in the third T20. India leads the five-match series 2-0. Strong batting and effective bowling have been key, though fielding needs improvement. Smriti Mandhana's performance is anticipated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.