फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर २२ धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं १५.३ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ९८ धावा केल्या होत्या. पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्यासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. फलंदाजीसह गोलंदाजीतही चुणूक दाखवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माची दे दणादण फलंदाजी पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत रोहितने भाराताल आक्रमक सुरुवात करून दिली. रोहितच्या या दमदार सुरुवातीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 167 धावा करता आल्या. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांनी यावेळी ६७ धावांची सलामी करून दिली. धवन यावेळी २३ धावांवर बाद झाला. धवन बाद झाल्यावरही रोहितने आपली धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवली. रोहितने ५१ चेंडूंत ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६७ धावांची खेळी साकारली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs West Indies: भारताचा वेस्ट इंडिजवर २२ धावांनी विजय; मालिकाही खिशात
India vs West Indies: भारताचा वेस्ट इंडिजवर २२ धावांनी विजय; मालिकाही खिशात
तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 06:39 IST