Join us

IND vs WI T20: पहिला आराम, नंतर काम; टीम इंडियाचा नवा फंडा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना लखनऊ येथे होणार आहे. पण या सामन्यासाठी संघाने सराव करण्यापेक्षा आराम करण्यावरच जास्त भर दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 21:42 IST

Open in App
ठळक मुद्देविमानतळावरून खेळाडूंनी थेट हॉटेल गाठलं आणि त्यानंतर त्यांनी आराम करण्याचा निर्णय घेतला.

कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. वेस्ट इंडिजवर त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. आता ट्वेन्टी-20 मालिका जिंकायलाही भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना लखनऊ येथे होणार आहे. पण या सामन्यासाठी संघाने सराव करण्यापेक्षा आराम करण्यावरच जास्त भर दिला आहे.

रविवारी भारताने वेस्ट इंडिजवर पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात मात केली. त्यानंतर एका दिवसाच्या फरकानंतर दुसरा ट्वेन्टी-20 सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ आज लखनऊ येथे दाखल झाला. विमानतळावरून खेळाडूंनी थेट हॉटेल गाठलं आणि त्यानंतर त्यांनी आराम करण्याचा निर्णय घेतला. सामनादेखील रात्री सात वाजता असल्यामुळे सकाळी भारतीय संघ सराव करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज