Join us

पाकिस्तानी खेळाडूने इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा केला अपमान, निवृत्तीबद्दल केलं 'हे' विधान

Virat Kohli vs Pakistan Cricket: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीबाबत केलेले विधान ऐकून तुम्हालाही राग येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:00 IST

Open in App

Virat Kohli vs Pakistan Cricket: टीम इंडिया पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामने खेळवले जातील. या काळात भारतीय संघाचा सुपरस्टार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली खेळताना दिसणार नाही. त्याने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच इंग्लंड दौरा अजून सुरूही झालेला नाही, पण पाकिस्तानी खेळाडूंनी या मालिकेबद्दल आणि विराट कोहलीबद्दल विधाने करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी दिग्गज खेळाडू बासित अलीने कोहलीबद्दल धक्कादायक विधान केले आहे आणि त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत तो कोहलीची स्तुती करत असे. पण भारतात पाकिस्तानी चॅनेल्सवर बंदी आल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा तीळपापड होताना दिसतोय.

कोहलीबद्दल काय म्हणाला पाकिस्तान क्रिकेटर?

२० जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी, बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर कोहलीबद्दल एक विधान केले. तो म्हणाला की विराट कोहलीने निवृत्ती घेतली हे चांगले झाले, अन्यथा इंग्लंडमध्ये त्याचा खूप अपमान झाला असता. एवढेच नाही तर बासित अलीने असा दावाही केला की भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच तो टीम इंडियावर बहिष्कार टाकण्याची धमकी देत ​​होता. त्याने पाकिस्तानी माध्यमांमध्ये भारतीय संघाला आशिया कपमधून वगळावे असे सुचवले होते. तसेच, जगातील इतर संघांनी एकत्र येऊन टीम इंडियाला क्रिकेटपासून दूर ठेवावे, असेही सांगितले होते. त्यातच टीम इंडियाची मालिका सुरू होण्यापूर्वी बासित अलीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर त्यासंबंधी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वी हेच लोक भारतीय खेळाडूंचे गुणगान गात असत. असे मानले जाते की त्याला भारतातून भरपूर व्ह्यूज आणि पैसे मिळत होते. पण पाकिस्तानशी झालेल्या संघर्षानंतर, भारतात त्यांच्या चॅनेल आणि सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे आणि त्याच्या कमाईची साधने कमी झाली. भारत सरकारच्या या कारवाईनंतर, अनेक युट्यूबर्स आणि क्रिकेटपटूंनी भारताबद्दलची आपली मते बदलली आणि ते भारताविरोधात आक्रमक झाले.

पहलगाम हल्ल्यावरही व्यक्त केले होते मत

"पहलगाम हल्ल्यात २६ जण ठार झाले. मी त्यांना शहीद म्हणेन. हा एक मोठा अत्याचार आहे. मी ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्या अक्षम्य आहेत. ते कोणीही असोत, कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही. माझा धर्म हेच सांगतो. हिंदू असो, यहूदी असो किंवा ख्रिश्चन असो, कोणालाही अधिकार नाही. जो कोणाचाही जीव घेईल तो मुस्लिम असू शकत नाही. जरी तो माझा मोठा भाऊ असला तरी मी त्याला गोळ्या घालेन. पहलगामची बातमी खूप दुःखद आहे. पीडित कुटुंबांना श्रद्धांजली," असे पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना बासित अली म्हणाला होता.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५विराट कोहलीपाकिस्तानइंग्लंड