भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. २० जून पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका करूण नायरसाठी एकदमच खास असेल. कारण २०१६ मध्ये ज्या इंग्लंड संघाविरुद्ध घरच्या मैदानावर त्याने दाबात पदार्पण केले होते त्या संघाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानातील सामन्यातून तो पुन्हा एकदा कसोटीत कमबॅक करणार आहे. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळल्यावर देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर ८ वर्षांनी त्याला टीम इंडियाकडून संधी मिळालीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
करुण नायर प्लेइंग इलेव्हनमध्ये फिक्स, BCCI नं दिली हिंट
बीसीसीआयने एक खास व्हिडिओ शेअर करत करुण नायरला पहिल्या कसोटी सामन्यापासूनच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये लोकेश राहुलचीही झलक पाहायला मिळते. तो आपल्या सहकाऱ्याच्या कमबॅकची स्टोरी सांगताना दिसते.
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय? संधीचं सोन करेन
BCCI नं जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात करुण नायर म्हणतोय की, मला पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. हा माझ्यासाठी खास आणि मोठा क्षण आहे. या संधीचं सोन करण्यासाठी प्रयत्नशील असेन. मग पिक्चरमध्ये येतो लोकेश राहुल. मी नायरला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. आम्ही अनेक महिने एकत्र खेळलो आहोत. खूप मोठा संघर्षानंतर तो कमबॅक करतोय, असे सांगत लोकेश राहुलही आपल्या मित्राच्या कमबॅकसाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.
करुण नायरसंदर्भात काय म्हणाला केएल राहुल?
सर्वांना माहितीये की, इंग्लंड काउंटी चॅम्पियनशिप खेळत असताना तो एकटा पडला होता. पण आता त्याने भारतीय संघात शानदार कमबॅक केले आहे. हा क्षण त्याच्यासाठी नक्कीच खूप खास आहे. काउंटी क्रिकेटमध्ये त्याने जो अनुभव घेतलाय तो यावेळी टीम इंडियाच्या कामी येईल, अन् तो दमदार कमबॅक करेल, अशा आशाही लोकेश राहुलनं व्यक्त केली आहे.
करुण नायरची कसोटीतील कामगिरी
करुण नायर आतापर्यंत भारतीय संघाकडून ६ कसोटी सामने खेळला आहे. यात ६२ पेक्षा अधिकच्या सरासरीसह त्याने ३७४ धावा काढल्या आहेत. नाबाद ३०३ ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. नायरच्या इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. ३ कसोटी सामन्यात त्याने या संघाविरुद्ध १६० च्या सरासरीनं ३२० धावा कुटल्या आहेत. इंग्लंड विरुद्धच त्याने त्रिशतकी खेळी केली होती. सेहवागनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज आहे.