Day Night Test : भारत-इंग्लंड ( India vs England) तिसऱ्या कसोटीचा निकाल दोन दिवसांत लागला. इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत, तर दुसरा डाव ८१ धावांत गडगडला. इंग्लंडच्या २० पैकी १९ विकेट्स या भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. इशांत शर्माला एक विकेट मिळाली. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ( Narendra Modi Stadium) खेळपट्टीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) यानं खेळपट्टीवर टीका केली. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) यानंही खेळपट्टीवर शंका उपस्थित केली आणि वॉननं त्याचे आभार मानले. टीम इंडिया आज अदानी पोर्टवर, तर उद्या रिलायन्स रिफायनरीत; वासीम जाफरनं शेअर केला प्लान
मायकेल वॉननं दोन दिवसात सामना संपल्यानंतर ट्विट केलं की, अशी खेळपट्टी असेल, तर काय पर्याय असेल हे मी सांगू इच्छितो. दोन्ही संघांना ३-३ डाव खेळण्यास द्यावे. १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता
काय म्हणाला युवराज? युवराजनं ट्विट केलं की,''दोन दिवसांत निकाल लागणे, हे कसोटी क्रिकेटसाठी चांगलं आहे की नाही, याबाबत संभ्रमात आहे. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांना अशा खेळपट्टी मिळाल्या असत्या तर त्यांनी १००० व ८०० विकेट्स घेतल्या असत्या? भारतीय संघाचे अभिनंदन. अक्षर पटेलनं चांगली गोलंदाजी केली. आर अश्विन व इशांत शर्मा यांचेही अभिनंदन.''