IND vs ENG 5th Test India Won By 6 Runs Mohammed Siraj : ओव्हलच्या मैदानातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकत इतिहास रचला आहे. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाला विजयासाठी ३५ धावांची गरज होती. ४ विकेट्स हाती असल्यामुळे सामना इंग्लंडच्या हातात होता. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सर्व ताकदपणाला लावत "हारी बाजी को जिताना हमे आता है...." या तोऱ्यात जबरदस्त कमबॅक करून ओव्हलचं मैदान मारलं. मोहम्मद सिराजनं घेतलेल्या ३ विकेट्स अन् प्रसिद्ध कृष्णानं त्याला एक विकेट घेत दिलेली साथ याच्या जोरावर भारतीय संघाने ६ धावांनी सामना जिंकत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात २२४ धावा केल्यावर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात २४७ धावा केल्या होत्या. इंग्लंडची अल्प आघाडी भेदून टीम इंडियाने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत इंग्लंडसमोर ३७४ धावांचा टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर बेन डकेटच्या अर्धशतकानंतर हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी शतकी खेळी केली.