शुबमन गिल आणि लोकेश राहुलच्या संयमी भागीदारीनंतर वॉशिंग्ट सुंदर आणि रवींद्र जडेजानं दाखवलेल्या संयमाच्या जोरावर भारतीय संघाने टीम इंडियाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात आला. पहिल्या डावात भारतीय संघाला ३५८ धावांवर आटोपल्यावर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ६६९ धावा करत ३११ धावांची मोठी आघाडी घेत या सामन्यासह मालिका खिशात घालण्यासाठी परफेक्ट सेटप केला होता. दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात भारतीय संघाने दोन विकेट्स गमावल्यावर टीम इंडियावर या सामन्यात चौथ्या दिवशीच धावांनी नव्हे तर डावांनी पराभवाचे संकट ओढावण्याची भिती निर्माण झाली होती. पण चौघांच्या दमदार इनिंगच्या जोरावर टीम इंडियाने सामना पाचव्या दिवसावर नेला आणि अखेर हा सामना अनिर्णित राखला अन् मालिकेचा निकालही पाचव्या कसोटीच्या दिशेनं नेला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
इंग्लंडच्या बाजूनं झुकला होता सामना, पण शेवटी टीम इंडियाने हा सामना अनिर्णत राखण्यात यश मिळवले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 22:19 IST