Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 4th Test : भारताने रोवली 72 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची पताका 

IND vs AUS 4th Test: भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत हार मानण्यास भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 09:02 IST

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत हार मानण्यास भाग पाडले.  पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे चौथी कसोटी अनिर्णीत राहिली आणि भारताने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियात 72 वर्ष 11 कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताला प्रथमच मालिका विजयाची पताका रोवता आली. भारतीय संघाने ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. सिडनी कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला बरोबरी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार होती. पण दडपणाचे हे ओझे ते पेलवू शकले नाही. भारतीय संघानेही त्यांना कोणतीच संधी दिली नाही. भारताने पहिल्या डावातच 622 धावांचा डोंगर उभा केला. चेतेश्वर पुजारा ( 193 ) आणि रिषभ पंत ( 159* ) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला.

करा किंवा मरा या कात्रीत सापडलेल्या ऑसींकडून दर्जेदार खेळ झाला नाही. त्यांचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला. कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद 6 धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही. 

भारतीय संघ 1947 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत 11 मालिकेत भारताला विजय मिळवता आले नाही. त्यापैकी 3 मालिका भारताने बरोबरीत सोडवल्या, तर 8 मालिकांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला. 72 वर्षानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली