Join us  

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानने आणला फेस, तरी पाकिस्तानने जिंकली रेस

अफगाणिस्तानने पाकिस्तानपुढे 228 धावांचे आव्हान ठेवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 10:22 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या नाट्यपूर्ण लढतीत अखेर अफगाणिस्तानवरपाकिस्तानने विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले. अफगाणिस्ताननेपाकिस्तानपुढे 228 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग पाकिस्तानने अखेरच्या षटकात केला.

अफगाणिस्तानच्या 228 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला चांगली सुरुवात करता आली नाही. मोहम्मद नबी, मुजीब उर रेहमान आणि रशिद अली यांनी पाकिस्तानचा अर्धा संघ गारद केले आणि त्यांच्यावर दडपण आणले.

तत्पूर्वी अफगाणिस्तानने नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीपुढे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आफ्रिदीने यावेळी चार विकेट्स मिळवत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. पण असगर अफगाण आणि नजिबुल्ला झारदान यांच्या प्रत्येकी 42 धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 227 धावा करता आल्या.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांची स्टेडियममध्येच हाणामारी

आज विश्वचषकात  पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना रंगत आहे. पण हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरु असताना दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरळीत सुरु होता. पण यावेळी अशी एक घटना घडली की, या दोन्ही देशांतील चाहते एकमेकांवर तुटून पडले. या दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. 

नेमके प्रकरण घडले तरी काय...पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामना सुरु होता. यावेळी मैदानावरून एक अनधिकृत विमान गेले. या विमानावर 'जस्टिस फॉर बलूचिस्तान' हे शब्द मोठ्या अक्षरांत लिहिले गेले होते. हे शब्द दोन्ही देशांतील चाहत्यांनी पाहिले आणि त्यांच्यामध्ये जोरदार मारामारी सुरु झाली.

हे विमान होते तरी कोणाचे...लीड्सच्या मैदानावरून विमान गेल्यावर ही मारामारी सुरु झाली. पण हे विमान नेमके होते तरी कोणाचे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. लीड्स एयर ट्रॅफिक विभागाला याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी लीड्स एयर ट्रॅफिक विभागाला या विमानाबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती.

भारत-इंग्लंड सामन्यात पाऊस घालणार का खोडा; जाणून घ्या...भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णयाक सामना उद्या होणार आहे. या सामन्यातील विजयामुळे दोन्ही संघांचे भविष्य बदलू शकते. कारण इंग्लंडने जर हा सामना गमावा तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारताचा संघ उत्सुक असेल.

सध्याच्या घडीला भारत हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने सामना सामन्यांमध्ये पाच सामने जिंकले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारताला एका गुणावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भारताचे सध्याच्या घडीला 11 गुण आहेत. त्यामुळे हा सामना जर भारताने जिंकला तर 13 गुणांसह ते उपांत्य फेरी गाठू शकतात.

इंग्लंडचा संघ विश्वचषकाच्या सुरुवातीला अव्वल स्थानावर विराजमान होता. पण आता इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. कारण इंग्लंड आतापर्यंत सात सामने खेळला आहे. या सात सामन्यांमध्ये इंग्लंडने चार सामने जिंकले आहेत, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडचा संघ सध्या आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पण इंग्लंडने जर उर्वरीत दोन सामन्यांपैकी एक जरी सामना गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानअफगाणिस्तान