Join us

ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध; वाच कोण काय म्हणाले!

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 09:55 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात सुधारणा करताना पाकिस्ताननं विजय मिळवला. त्यांनी उभ्या केलेल्या 7 बाद 308 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 9 बाद 259 धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयानंतर सोशल मीडियावर पाक संघाचे कौतुक होत आहे, परंतु या सामन्यापूर्वी याच संघावर बोचऱ्या शब्दात टीका करण्यात येत होती. त्यात माजी खेळाडूंचाही समावेश होता. पण, आफ्रिकेवरील विजयानं आत्मविश्वास उंचावलेल्या कर्णधार सर्फराज अहमदनं माजी खेळाडू शोएब अख्तरला सडेतोड उत्तर दिले. 

ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली!भारताकडून झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तरनं टीका करताना सर्फराजला बिनडोक कर्णधार म्हटले होते. त्याच्या या टीकेला सर्फराजनं रविवारी उत्तर दिले. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात  भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. या पराभवानंतर अख्तरनं सर्फराजला चक्क बिनडोक म्हटलं होतं.

नाणेफेकीचा कौल बाजूनं लागूनही सर्फराजनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मतही अख्तरने व्यक्त केले. तो म्हणाला,''खेळपट्टी पूर्णपणे कोरडी होती. ती संपूर्ण वेळ झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यावर दव जमण्याची कोणतीच शक्यता नव्हती. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बिनडोकच घेऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं अशी चूक केली होती आणि आज पाकिस्ताननं त्याची पुनरावृत्ती केली.''

अख्तरच्या या टीकेवर सर्फराज म्हणाला,''खरं सांगायचं तर अख्तरच्या कोणत्याही वक्तव्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. त्याला प्रत्युत्तर देणे म्हणजे त्याच्याकडून टीकेला निमंत्रण देण्यासारखं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही खेळाडू नाहीत. आम्ही कोण आहोत, हे त्याला सांगण्याची मला गरज वाटत नाही. काही लोकं टीव्हीवर मुलाखती दिल्यानंतर स्वतःला देवच समजायला लागतात.''  

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानशोएब अख्तर