Join us  

ICC T20 World Cup Shifted : Big News : भारतात रंगणार नाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा थरार, जय शाह यांची मोठी घोषणा

ICC T20 World Cup Shifted : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) सचिव जय शाह यांनी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारतात होणार नसल्याची घोषणा सोमवारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 2:31 PM

Open in App
ठळक मुद्देट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या १६ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येईल आणि त्यांचे सामने यूएई व ओमान येथे खेळवण्यात येतील.

ICC T20 World Cup Shifted : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) सचिव जय शाह यांनी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारतात होणार नसल्याची घोषणा सोमवारी केली. ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे होणार असून स्पर्धेची तारखा आयसीसी जाहीर करतील,''अशी माहिती जय शाह यांनी ANI शी बोलताना दिली. बीसीसीआयनं या स्पर्धा आयोजनाचे हक्क स्वतःकडे राखले आहे.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही PTI शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. 

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना, पाहा Photo

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या घरात गेली आहे. २०२०-२१ मध्ये देशातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती, परंतु एप्रिल व मे या महिन्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं. एका दिवसाला ४ लाख रुग्णांची भर पडल्याचे आकडेवारी सांगते. आयपीएल २०२१साठी बीसीसीआयनं तयार केलेलं सुरक्षित बायो बबलमध्येही कोरोनानं शिरकाव केला अन् एकामागून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.  

''वर्ल्ड कप स्पर्धेबाबत निर्णय आयसीसीला कळवण्याचा आज अंतिम दिवस होता. त्यामुळे बीसीसीआय अधिकाऱ्यांसोबत आज कॉन्फरन्स कॉल झाला. २-३ महिन्यात काय घडेल, याबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे आम्ही आयसीसीला कळवणार आहोत. भारतानंतर या स्पर्धेसाठी हेच योग्य ठिकाण आहे. भारतातच या स्पर्धेचं आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न होता. आयपीएलनंतर लगेचच ही स्पर्धा सुरू होईल. पात्रता फेरीचे सामने ओमान येथे होतील आणि उर्वरित सामने दुबई, अबु धाबी व शाहजाह येथे होतील,''असे बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला (  BCCI Vice-President Rajeev Shukla ) यांनी सांगितले.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या १६ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येईल आणि त्यांचे सामने यूएई व ओमान येथे खेळवण्यात येतील. पहिल्या फेरीत १२ सामने होतील आणि दोन गटांतील आघाडीवर असलेले प्रत्येकी दोन-दोन असे चार संघ सुपर १२साठी पात्र ठरतील. बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पपुआ न्यू गिनी यापैकी चार संघ सुपर १२ मध्ये प्रवेशासाठी खेळतील. आयसीसी क्रमवारीत अव्वल ८ क्रमांकावर असलेले संघ आधीच सुपर १२साठी पात्र ठरलेले आहेत. सुपर १२मध्ये ३० सामने होतील आणि २४ ऑक्टोबरला या सामन्यांची सुरुवात होईल.  सुपर १२ संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल आणि त्यांचे सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह या तीन मैदानावर होतील. त्यानंतर तीन प्ले ऑफ सामने, दोन सेमी फायनल व एक फायनल अशी स्पर्धा पुढे सरकेल.

टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०बीसीसीआयजय शाहसंयुक्त अरब अमिराती