Join us  

भारताकडून श्रीलंकेचा ट्वेन्टी-20 मालिकेतील सलग चौथा पराभव

या विजयाबरोबरच या मालिकेमध्ये ४ - ० अशी आघाडी घेत भारतीय संघ श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याच्या जवळ पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 9:27 PM

Open in App

लुधियाना : भारतामध्ये सुरु असलेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या ५ सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेमध्ये आज भारताने श्रीलंकेचा सलग चौथा पराभव केला. या विजयाबरोबरच या मालिकेमध्ये ४ - ० अशी आघाडी घेत भारतीय संघ श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याच्या जवळ पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फलंदाज फार काळ तग धरू शकले नाहीत आणि फक्त १३७ धावांवर श्रीलंकेचा संघ बाद झाला. 

श्रीलंकेने समोर ठेवलेल्या १३७ धावांच्या माफक आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाने आपले सलामीचे ३ फलंदाज लवकर गमावले. नंतर मात्र नाबाद अर्धशकात करणाऱ्या सुनील रमेशला कर्णधार अजय रेड्डीने चांगली साथ देऊन भारताला सहजरित्या विजय मिळवून दिला.

टॅग्स :भारतश्रीलंका