स्वदेश घाणेकर -भारतीय चाहते २९ जानेवारी २०२३ तारखेला द्विधा मनस्थितीत होते. १९ वर्षांखालील मुलींच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल अन् भारत-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी ट्वेंटी-२० लढत, जवळपास एकाच वेळी लाईव्ह सुरू होत्या. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी पाहण्याऱ्या प्रेक्षकांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष (टीव्ही, मोबाईल) उपस्थिती कोट्यवधींत होती. पण, ९९ धावांचा पाठलाग करताना या वाघांची शेळी होताना दिसली अन् चाहत्यांनी मुलींच्या ट्वेंटी-२०कडे मान वळवली. शेअर मार्केट वर जावा तसा टीव्ही व मोबाइल वरील या लाइव्ह सामन्याच्या स्ट्रीमिंग पाहणाऱ्यांचा आकडा झपाझप वर गेला. पुरुष क्रिकेट सुरू असताना प्रथमच महिलांच्या क्रिकेटला एवढा मान मिळाला असावा. त्यात सोने पे सुहागा! भारताच्या मुलींनी कमाल करताना हा इंग्लंडकडून ‘लगान’ वसूल केला अन् इतिहास घडविला.
२००७मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली असाच इतिहास घडला होता. आयसीसीची पहिलीवहिली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा भारताने जिंकली होती. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील मुलींनी तोच करिष्मा केला. आयसीसीची स्पर्धा जिंकणारा भारताचा हा महिलांचा पहिलाच संघ ठरला. उपांत्य फेरीत इंग्लंडने अवघ्या तीन धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीयांचे टेंशन हलकं केलं होतं. पण, इग्लंड कधी काय करेल, याचा प्रत्यय आल्यामुळे मुली सावध होत्या.
अर्चना देवी -
आई सावित्री देवीला मॅच पाहता यावी यासाठी अर्चनाने स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेत रवाना होण्यापूर्वी तिला स्मार्ट फोन घेऊन दिला. अर्चनाच्या वडिलांचे कर्करोगामुळे निधन झालेले. एका भावाचा सर्पदंशाने मृत्यू झालेला. त्याच भावाची इच्छा होती म्हणून अर्चना क्रिकेटपटू बनली. घरच्यांपासून दूर वसतिगृहात अर्चना राहत असल्यानं गावकऱ्यांनी घरच्यांना दुषणं दिली, परंतु ‘सावित्री’ची ही लेक अंतिम ध्येयापासून भरकटली नाही. फायनलमध्ये तिने दोन विकेट्स घेतल्याच, शिवाय एक अविस्मरणीय झेल टिपला.
पार्श्वी चोप्रा -
धोनीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुरुष क्रिकेटमध्ये झालेली क्रांती अन् खेळण्याचा अप्रोच बदलला. तसाच अप्रोच येणाऱ्या काळात महिला क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल यात आश्चर्य वाटायला नको. भारतातील महिला क्रिकेटच्या या नव्या युगाची नांदी आहे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करून ती जपण्याची जबाबदारी या मुलींवर आहे.
शेफाली वर्मा -