टीम इंडियाचा महत्त्वाचा फलंदाज पृथ्वी शॉ याला शनिवारी रणजी करंडक स्पर्धेतील कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वीच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला त्वरित बंगळुरु येथील बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत हलवण्यात आले आहे. त्यानंतर बीसीसीआयनं पृथ्वीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई आणि कर्नाटक यांच्यातला रणजी करंडक स्पर्धेतील सामना मुंबईच्या बीकेसी येथे खेळवण्यात आला होता. कर्नाटकने पाच विकेट राखून विजय मिळवताना मुंबईची डोकेदुखी वाढवली. मुंबईचा पहिला डाव 194 धावांवर गुंडाळून कर्नाटकनं पहिल्या डावात 218 धावा केल्या. दुसऱ्या डावातही मुंबईची घसरगुंडी कायम राहिली. त्यांना 149 धावाच करता आल्या आणि कर्नाटकनं 5 बाद 129 धावा करून सामना जिंकला.