IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी

IPL स्पर्धेदरम्यान खेळाडूंना पाळावा लागणार आणखी एक नियम, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 22:32 IST2026-04-08T22:31:09+5:302026-04-08T22:32:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
BCCI New Ruled That All The Benched Players Are Not Allowed To Move Around Ground During An IPL Match 2026 | IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी

IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी

IPL 2026 New Rule : आयपीएल २०२६ स्पर्धेच्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी बीसीसीआयने खेळाडू आणि फ्रँचायझी संघांसाठी कठोर नियमावली जाहीर केली होती. आता IPL मॅच दरम्यान शिस्त पाळण्यासाठी यात नव्या कठोर नियमाची भर पडली आहे. नव्या नियमानुसार. बाकावर बसणाऱ्या खेळाडूंना मैदानात जाण्यावर बंदी असेल. सामन्यादरम्यान फक्त तेच १६ खेळाडू मैदानावर ये-जा करू शकतील, ज्यांचा समावेश टीम मॅनेजमेंटने अधिकृत टीम शीटमध्ये केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बाउंड्री लाईनवर फक्त पाच खेळाडूंना परवानगी

 BCCI आणि IPL व्यवस्थापनाने संघांना निर्देश दिले आहेत की,  १६ खेळाडूंमध्ये नसलेले खेळाडू कोणत्याही परिस्थितीत मैदानावर जाणार नाहीत. ड्रिंक्स देण्यासाठी किंवा संदेश पोहोचवण्यासाठी या खेळाडूंना मैदानात जाण्याची परवानगी नसेल. नव्या नियमांनुसार एका वेळी फक्त संघातील पाच खेळाडूंनाच बाउंड्री लाईनजवळ थांबण्याची मुभा असेल. 

IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री

उर्वरित खेळाडू डगआउटपुरते मर्यादित

क्रिकबझने IPL फ्रँचायझीच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, इतर खेळाडूंना आता डगआउटमध्येच बसावे लागेल. त्यांना बाउंड्री लाईन आणि LED जाहिरात फलकांच्या दरम्यान फिरण्याची परवानगी नसेल. यापूर्वी नियमांमध्ये काही प्रमाणात सवलत होती, जिथे खेळाडू खेळात अडथळा न आणता ड्रिंक्स घेऊन मैदानात जाऊ शकत होते. मात्र आता BCCI ने मॅच प्लेइंग कंडिशन्स (MPC) मधील क्लॉज ११.५.२ आणि २४.१.४ अधिक कडक करत स्पष्ट बंदी घातली आहे.

हा निर्णय का घेतला?

या नव्या नियमामागचे अचूक कारण स्पष्ट झालेले नसले तरी, सामन्यादरम्यान शिस्त राखण्यासाठी आणि अनावश्यक हालचाल टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. लखनौ सुपर जाएंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान पंतने मारलेला विजय चौकारानंतर एक वाद निर्माण झाला होता. आवेश खानने चेंडू सीमापार होण्याआधीच तो बॅटने टोलावला होता. त्याची ही कृती देखील यामागचं कारण असू शकते. 

Web Title : आईपीएल का नया नियम: बीसीसीआई का सख्त दिशानिर्देश; सीमा के पास सीमित खिलाड़ी

Web Summary : बीसीसीआई ने मैदान पर खिलाड़ियों के आचरण के लिए आईपीएल के सख्त नियम लागू किए। केवल आधिकारिक टीम शीट में शामिल खिलाड़ी ही मैदान पर हो सकते हैं। अधिकतम पाँच खिलाड़ियों को बाउंड्री लाइन के पास रहने की अनुमति है, अनावश्यक आवाजाही को प्रतिबंधित करना और मैचों के दौरान अनुशासन बनाए रखना है।

Web Title : IPL New Rule: Strict BCCI Guidelines; Limited Players Near Boundary

Web Summary : BCCI enforces stricter IPL rules for player conduct on the field. Only players in the official team sheet can be on the field. A maximum of five players are allowed near the boundary line, restricting unnecessary movement and maintaining discipline during matches.