भारतीय क्रिकेट संघाचे झाले दिमाखात स्वागत

हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका जिंकता येईल. पण वेस्ट इंडिजने जर हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 20:05 IST2018-10-30T20:04:13+5:302018-10-30T20:05:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
amazing Welcome to Indian cricket team in Thiruvananthapuram | भारतीय क्रिकेट संघाचे झाले दिमाखात स्वागत

भारतीय क्रिकेट संघाचे झाले दिमाखात स्वागत

ठळक मुद्देयावेळी खास पारंपरिक ढोल वाजवत भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले.

नवी दिल्ली, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : मुंबईतील सामना जिंकत भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि निर्णायक सामना तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. आज भारतीय संघाचे तिरुवनंतपुरम येथे मोठ्या दिमाखात आगमन झाले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने सलग दुसरे शतक झळकावले. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा सर्वात जलद पूर्ण करण्याचा विक्रमही केला. पण या सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पुणे येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली होती. पण मुंबईत रोहित शर्माने साकारलेल्या दीडशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी पुन्हा एकदा आघाडी मिळवली. 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि निर्णायक सामना तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका जिंकता येईल. पण वेस्ट इंडिजने जर हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते.


तिरुवनंतपुरममध्ये आज भारताचा संघ दाखल झाला. चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी खास पारंपरिक ढोल वाजवत भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले.

Web Title: amazing Welcome to Indian cricket team in Thiruvananthapuram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.