Abhishek Sharma Bat IND vs NZ World Cup Final 2026: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा विश्वचषकात फारसा चांगला खेळ करू शकला नाही. फायनलचा सामना वगळता त्याला आपल्या फलंदाजीची छाप पाडता आली नाही. सुरुवातीच्या तीन सामन्यात तो सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला. नंतरही त्याला सूर गवसत नव्हता. पण अंतिम फेरीत त्याने शानदार कामगिरी केली आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अभिषेक फायनलमध्ये २१ चेंडूत ५२ धावा केल्या. या खेळाडूने अंतिम सामन्यात ३ षटकार आणि ६ चौकार मारले. या विजयानंतर अभिषेक शर्माबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे.
अभिषेक शर्माने बॅट कोणाकडून घेतली होती?
अभिषेक शर्माने सांगितले की अंतिम सामन्यात तो स्वतःच्या नव्हे तर दुसऱ्याच्या बॅटने खेळत होता. त्याने दुसऱ्या खेळाडूकडून बॅट उधार घेऊन फलंदाजी केली. टी२० विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर अभिषेक शर्माने खुलासा केला की, त्याने फायनलमध्ये शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली. तो म्हणाला, "आज मी शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली. सकाळी मला वाटले की मी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा. गिल माझ्यासोबत नव्हता, म्हणून मी दुबेकडे गेलो आणि त्याची बॅट घेतली. धन्यवाद, दुबे."
भारत बनला चैंपियन | IND v NZ T20 WC Final Match Highlights
१८ चेंडूत अर्धशतक झळकावले
अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक फायनलमध्ये फक्त १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. या खेळाडूने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. अभिषेकने सॅमसनसोबत ९८ धावांची भागीदारी केली ज्यामुळे भारताच्या जेतेपदाच्या विजयाचा पाया रचला गेला. तथापि, ही स्पर्धा अभिषेक शर्मासाठी खूपच वाईट ठरली. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषकात फक्त १७.६ च्या सरासरीने १४१ धावा केल्या. तो तीन वेळा शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्माची फलंदाजांमध्ये सर्वात कमी फलंदाजी सरासरी होती. तथापि, जेतेपदाच्या लढतीत अभिषेक शर्माने आपली ताकद दाखवली आणि सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली.