इंग्लंड-भारत यांच्यातील कसोटी मालिका सुरु असताना भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे. भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी (Dilip Doshi) यांचे सोमवारी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. ते लंडनमध्ये वास्तव्यास होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बीसीसीआयसह अनेक आजी माजी क्रिकेटर्संनी फिरकीपटू दिलीप दोशी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एक मिनिटाचे मौन, दोन्ही संघातील खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात
लीड्स येथील हेडिंग्ले हेडिंग्लेच्या मैदानात पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळत भारतीय दिग्गज फिरकीपटूला श्रद्धांजली वाहिल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर भारत आणि इंग्लंड दौन्ही संघातील खेळाडूंनी काळी पट्टी बांदून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघातील खेळाडू डावखुऱ्या हाताच्या फिरकीपटूनं भारतीय संघाशिवाय इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्येही आपल्या फिरकीची खास छाप सोडली होती. वयाच्या तिशीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून १०० विकेट्स घेणारे ते एकमेव गोलंदाज आहेत.
या फिरकीपटूनं आंतरारष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये सोडलीये खास छाप
दोशी यांनी १९७९ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. १९७९ ते १९८३ दरम्यान ३३ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. डावखुऱ्या फिरकीपटून कसोटीत ११४ बळी आपल्या खात्यात जमा आहेत. सहा वेळा त्यांनी पाच विकेट्सचा डाव साधला. वनडेत त्यांच्या नावे २२ विकेट्स जमा आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही या गोलंदाजाने २३८ सामन्यांमध्ये ८९८ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.