MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

पावसामुळे मुंबई इंडियन्सला कसा बसू शकतो फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 21:03 IST2025-06-01T20:51:10+5:302025-06-01T21:03:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Match Start Delayed DueTo Rain Akash Ambani Reaction Goes Viral | MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2  Akash Ambani Reaction Goes Viral : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील दुसरा फायनलिस्ट ठरवण्यासाठी नियोजित क्वालिफायर २ ची लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नियोजित आहे. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणाऱ्या सामन्यातून दुसरा फायनलिस्ट निश्चित होणार आहे. पण या सामन्यात पावसाचा व्यत्यय आणला आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस वेळेत झाला, पण मुंबई इंडियन्सचे फलंदाज बॅटिंगला उतरण्याआधी पावसाने पुन्हा बॅटिंग सुरु केली. पाऊस पडल्यामुळे पुन्हा खेळपट्टी कव्हर करण्यात आली. हे दृश्य मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसह या सामन्या वेळी  संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थितीत असलेल्या MI फ्रँचायझी संघ मालकांचा चेहराही पाडणारे होते.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला उशीर होत असताना सोशल मीडियावर आकाश अंबानी आणि नीता अंबानी यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. व्हायर होणाऱ्या फोटोत नीता अंबानी यांच्या हातात छत्री दिसते. दुसरीकडे आकाश अंबानी हे पावसामुळे थोडे टेन्शनमध्ये असल्याचे जाणवते. त्यांची ही रिअ‍ॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. यामागचं कारण हे की, पावसामुळे सामना रद्द झाला तर त्याचा फटका थेट मुंबई इंडियन्सला बसणार आहे.  

Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!

पावसामुळे मुंबई इंडियन्सलाच का बसू शकतो फटका, कारण...

आयपीएलच्या क्वालिफायर लढतीसाठी राखीव दिवसाची तरतूद नाही. नव्या नियमानुसार, २ तास अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे ९ वाजून ३० मिनिटांपर्यंत सामना सुरु झाला तरी प्रत्येकी २०-२० षटकांचा खेळ होऊ शकतो. त्यानंतर मात्र षटक कपात सुरु होईल. निकालासाठी किमान प्रत्येकी ५-५ षटकांचा खेळ होणं आवश्यक आहे. तेही झाले नाही तर गुणतालिकेत अव्वल असणारा संघ फायनल गाठेल. मुंबई इंडियन्सच्या संघाच्या खात्यात फक्त १६ गुण आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्जचा संघ यंदाच्या हंगामात १९ गुणांसह टॉपर राहिला आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाला तर पंजाब किंग्जला फायनलचे तिकीट मिळेल.  

...अन् BCCI चा डाव फसला 

भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आठवड्याभराच्या ब्रेकनंतर स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यावर बीसीसीआयने सुधारित वेळापत्रकासह सामन्यांची ठिकाणे बदलली. पावसामुळे सामन्याला फटका बसू नये यासाठी कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येणारा क्वालिफायर २ चा सामना अहमदाबादमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण ज्यासाठी बीसीसीआयने हा खटाटोप केली तो डावच फसल्याचे दिसते. कारण जे ठिकाण निवडले तिथं पावसाच्या व्यत्यय निर्माण झालाय.  त्यामुळे काहीजण बीसीसीआयच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत आहेत.

Web Title: IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Match Start Delayed DueTo Rain Akash Ambani Reaction Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.