नवी दिल्ली : भारतीय गोलंदाजांनी गेल्या १० कसोटी सामन्यात १८६ बळी घेतले असून त्यात १२३ बळी वेगवान गोलंदाजांच्या खात्यात गेले आहेत. यावरुन गेल्या काही वर्षात भारताच्या आक्रमणामध्ये सीम व स्विंगची ताकद वाढली असल्याची प्रचिती येते. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांनी केवळ मायदेशातच नव्हे तर विदेशातही आपली छाप सोडली आहे.
कर्णधार विराट कोहलीनेही त्यांच्यावर पूर्ण विश्वास दर्शवला आहे. भारतीय संघ गेल्या वर्षभरात १० पैकी ८ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला असून त्यात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी या सामन्यांत १०२ बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या नेतृत्वाखालील फिरकीपटूंनी या सामन्यांत ५४ बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)
कर्णधार कसोटी सामने बळी
महेंद्रसिंग धोनी ६० सामने फिरकीपटू ४७०, वेगवान गोलंदाज ४६६ बळी
सौरव गांगुली ४९ सामने फिरकीपटू ४०४, वेगवान गोलंदाज ३६१ बळी
मोहम्मद अझहरुद्दीन ४७ सामने फिरकीपटू ३७९, वेगवान गोलंदाज ३१९ बळी
सुनील गावस्कर ४७ सामने फिरकीपटू ३१०, वेगवान गोलंदाज ३०४ बळी
मंसूर अली खा पतोडी ४० सामने फिरकीपटू ४६८, वेगवान गोलंदाज १०९ बळी
कपिल देव ३४ सामने फिरकीपटू २२८, वेगवान गोलंदाज २११ बळी
सचिन तेंडुलकर २५ सामने फिरकीपटू १५७, वेगवान गोलंदाज १८२ बळी
राहुल द्रविड २५ सामने फिरकीपटू १८६, वेगवान गोलंदाज २११ बळी
कुणी किती बळी घेतले
मोहम्मद शमी १० सामने ४५ बळी
जसप्रीत बुमराह ६ सामने ३४ बळी
इशांत शर्मा ८ सामने २७ बळी
उमेश यादव ४ सामने १७ बळी
रविचंद्रन अश्विन ५ सामने २६ बळी
रवींद्र जडेजा ८ सामने २६ बळी
१९३२ पासूनची आकडेवारी
५३९ सामने ७७६० बळी
३२६० बळी
(११२ वेगवान गोलंदाज)
४४०१ बळी (९७ फिरकीपटू)
९९ बळी फिरकी व मध्यमगती अशा दोन्ही प्रकारे गोलंदाजी करणाऱ्यांनी घेतले. (उदा. दत्तू फडकर यांनी कारकिर्दीत ६२ बळी घेतले आहेत.)
कोहलीच्या नेतृत्वाखालील गोलंदाज
५२ कसोटी सामने ९११ एकूण बळी
४३४ बळी (वेगवान गोलंदाज)
४७७ बळी (फिरकीपटू)
मायदेशात २५ कसोटीत फिरकीपटूंनी ३०७ व वेगवान गोलंदाजांनी १५१ बळी घेतले. इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध भारतीय वेगवान गोलंदाजांनी १४ बळी घेतले. मायदेशात खेळताना एक सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांची ही सातवी सर्वोत्तम कामगिरी आहे. विक्रम १७ बळींचा असून हा २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकातामध्ये नोंदवला गेला होता.