'गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर विराट कोहलीचे कर्णधार काढावे'

गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यावर त्याने विराट कोहलीकडून भारताचे कर्णधारपद काढून घ्यावे, अशी अजब मागणी होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 06:45 PM2019-10-14T18:45:50+5:302019-10-14T18:48:41+5:30

whatsapp join usJoin us
after saurav Ganguly accepts BCCI presidency should remove Virat Kohli from captaincy | 'गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर विराट कोहलीचे कर्णधार काढावे'

'गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर विराट कोहलीचे कर्णधार काढावे'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान होणार आहे. पण गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यावर त्याने विराट कोहलीकडून भारताचे कर्णधारपद काढून घ्यावे, अशी अजब मागणी होताना दिसत आहे.

बॉलीवूडमधील कलाकार रशिद खानने गांगुलीकडे कोहलीला कर्णधारपदावरून काढण्याची मागणी केली आहे. रशिदने ट्विटरवर लिहिले होते की, " मी बऱ्याच काळापासून क्रिकेट पाहत नाही. कारण सध्या क्रिकेटमध्ये फिक्सिंग सुरु आहे. सौरव गांगुलींनी बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर विराट कोहलीचे कर्णधारपद काढायला हवे. विराटला कर्णधारपदावरून काढल्यानंतर मी पुन्हा क्रिकेट पाहायला सुरुवात करेन."


सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बसवण्यात 'या' मोठ्या नेत्याचा हात
मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान होणार आहे. बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. पण एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. पण या बऱ्याच कालावधीमध्ये काही घडना पडद्यामागेही घडत होत्या. बीसीसीआयचा अध्यक्ष हा बिनविरोध निवडून यावा, यासाठी बरीच खलबतं सुरु होती. पण यावेळी एक मोठे भाजपाचे नेते यावेळी पडद्यामागून सूत्र हलवत असल्याचे समजते.

बीसीसआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना ब्रिजेश पटेल यांना अध्यक्षपदावर विराजमान करायचे होते. त्यांच्यासमोर बीसीसीआयचे माजी पदाधिकारी अनुराग ठाकूर यांचे कडवे आव्हान होते. पण यावेळी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपले वजन वापरल्याचे म्हटले जात आहे. अमित शहा यांच्या म्हणण्यानंतर गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद देण्यात आले, असे म्हटले जात आहे. नॅशनल हेराल्ड या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.

Web Title: after saurav Ganguly accepts BCCI presidency should remove Virat Kohli from captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.