योजना मिळविण्यात अडचणी; हजारो शेतकरी वंचित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:11 IST2025-06-21T16:10:16+5:302025-06-21T16:11:08+5:30

५,४२८ शेतकऱ्यांनी काढली फार्मर आयडी : ८ हजार ५९३ शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

Difficulties in obtaining schemes; Thousands of farmers will be deprived | योजना मिळविण्यात अडचणी; हजारो शेतकरी वंचित राहणार

Difficulties in obtaining schemes; Thousands of farmers will be deprived

मंगल जीवने
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर :
तालुक्यात शेतीला प्राधान्य आहे. येथे १४ हजार २१ शेतकरी असून १८ जूनपर्यंत केवळ ५ हजार ४२८ शेतकऱ्यांनीच फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित ८ हजार ५९३ शेतकऱ्यांची नोंदणी होणे अद्याप बाकी आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.


शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीस बल्लारपूर तालुक्यात सुरुवात झाली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी नांदगाव पोडे, विसापूर, आरवट, आमडी, कोर्टी मक्ता, पळसगाव, किन्ही, मानोरा, कोठारी, कवडजई या गावात तहसील कार्यालयामार्फत घेण्यात आले. शिबिर यात १८ जूनपर्यंत ५ हजार ४२८ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंद केली आहे. परंतु जनजागृती सभा घेऊन सुद्धा ८ हजार ५९३ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे असे शेतकरी शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.


१८ जून पर्यंत ५ हजार ४२८ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंद केली आहे. परंतु जनजागृती सभा घेऊन सुद्धा ८ हजार ५९३ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे असे शेतकरी शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.


शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या अॅग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी तालुक्यात सुरू आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटरमध्ये फार्मर आयडीसाठी अर्ज दाखल करावे, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


काय आहे शेतकऱ्यांसाठीचे फार्मर आयडी व लाभ
राज्य शासनाच्या अॅग्रिस्टॅक उपक्रमांतर्गत, प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल स्वरूपातील एक अद्वितीय ओळख क्रमांक फार्मर आयडी दिला जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना विशेष क्रमांक व ओळखपत्र देण्यात येईल. हा क्रमांक आधार प्रमाणेच शेतीविषयक सर्व सरकारी योजनांमध्ये अनिवार्य असणार आहे. ओळख क्रमांक प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषी पायाभूत सुविधा निधी, शेती विकासासाठी इतर कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, किमान आधारभूत किंमत योजनेत खरेदीमध्ये नोंदणी, बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी अवजारे इत्यादी योजनेचा लाभसुलभरीत्या मिळणार आहे. 

Web Title: Difficulties in obtaining schemes; Thousands of farmers will be deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.