Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:13 IST2025-05-29T14:11:03+5:302025-05-29T14:13:18+5:30
Chandrapur Tiger Attack News: चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी वाघांच्या हल्ल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.

Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट
चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी वाघांच्या हल्ल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात या महिन्यात आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ११ जण ठार झाले. वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणीने जोर धरला.
महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी वाघाच्या हल्ल्यात दोन वेगवेगळ्या एक महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला. पहिली घटना चिचपल्ली वनक्षेत्रात घडली, जिथे मूल तहसीलमधील चिरोली गावातील रहिवासी नंदा संजय मकलवार (वय, ४५) सकाळी तिच्या पती आणि इतर काही लोकांसह लाकडी गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी एका वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. दुसरी घटना दुपारी चिचपल्ली परिसरात घडली, जिथे कांतापेठ येथील रहिवासी सुरेश सोपानकर (वय, ५२) गुरे चरायला गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला झाला, असे सांगण्यात आले.
या हल्ल्यांमुळे स्थानिक लोक घाबरले आहेत आणि प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहेत. वन विभागाने लोकांना जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन केले. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीपासून वाघाच्या हल्ल्यात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला.