Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात खळबळ; टॉप-१० पैकी ७ कंपन्यांचे ₹२ लाख कोटी बुडाले, TCS ला सर्वाधिक फटका

शेअर बाजारात खळबळ; टॉप-१० पैकी ७ कंपन्यांचे ₹२ लाख कोटी बुडाले, TCS ला सर्वाधिक फटका

Stock Market: या घसरणीचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 15:55 IST2026-04-26T15:54:23+5:302026-04-26T15:55:17+5:30

Stock Market: या घसरणीचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर झाला.

Stock Market: 7 out of the top 10 companies lost ₹2 lakh crore, TCS was the worst hit | शेअर बाजारात खळबळ; टॉप-१० पैकी ७ कंपन्यांचे ₹२ लाख कोटी बुडाले, TCS ला सर्वाधिक फटका

शेअर बाजारात खळबळ; टॉप-१० पैकी ७ कंपन्यांचे ₹२ लाख कोटी बुडाले, TCS ला सर्वाधिक फटका

Stock Market: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या तीव्र घसरणीमुळे देशातील आघाडीच्या कंपन्यांच्या बाजारमूल्य लक्षणीयरित्या घसरले आहे. टॉप-१० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या एकत्रित मार्केट कॅपमध्ये ₹२ लाख कोटींपेक्षा जास्त घट झाली आहे. सलग दोन आठवड्यांच्या तेजी नंतर बाजाराने अचानक घसरण घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.

TCS आणि रिलायन्सला सर्वाधिक फटका

या घसरणीचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर झाला. Tata Consultancy Services (TCS) च्या मार्केट कॅपमध्ये सुमारे ₹६६,६९९ कोटींची घट झाली. तर, Reliance Industries Limited ला देखील मोठा फटका बसला असून कंपनीच्या मूल्यात ₹५०,६७० कोटींची घसरण झाली आहे. या दोन दिग्गज कंपन्यांमधील घसरणीमुळे बाजाराच्या एकूण दिशेवर मोठा परिणाम झाला.

इतर मोठ्या कंपन्यांनाही फटका

HDFC Bank
Life Insurance Corporation of India (LIC)
Bharti Airtel
ICICI Bank
Larsen & Toubro

या सर्व कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही लक्षणीय घट नोंदवली गेली. यावरून बाजारातील कमजोरी व्यापक स्तरावर पसरल्याचे स्पष्ट होते.

घसरणीची प्रमुख कारणे

तज्ज्ञांच्या मते, या घसरणीमागे जागतिक स्तरावर वाढते भू-राजकीय तणाव, आयटी कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमकुवत आर्थिक निकाल, पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि 
कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ, ही कारी प्रमुख कारणे आहेत.

काही कंपन्यांची सकारात्मक कामगिरी

दरम्यान, बहुतांश कंपन्यांना फटका बसला असताना काही कंपन्यांनी मात्र चांगली कामगिरी केली.

Hindustan Unilever
State Bank of India
Bajaj Finance

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला.

आगामी काळातील संकेत

तज्ज्ञांचे मत आहे कीस जागतिक परिस्थिती स्थिर होईपर्यंत बाजारात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना सध्या सावधगिरी बाळगण्याचा आणि विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : शेयर बाजार में उथल-पुथल: शीर्ष कंपनियों को ₹2 लाख करोड़ का नुकसान

Web Summary : पिछले हफ्ते भारतीय शेयर बाजार में उथल-पुथल मची रही, जिसमें शीर्ष कंपनियों को बाजार पूंजीकरण में ₹2 लाख करोड़ से अधिक का नुकसान हुआ। भू-राजनीतिक तनाव, कमजोर आईटी परिणाम और बढ़ते तेल की कीमतों के कारण टीसीएस और रिलायंस को सबसे ज्यादा नुकसान हुआ। विशेषज्ञों ने सावधानी बरतने की सलाह दी है।

Web Title : Stock Market Turmoil: Top Companies Lose ₹2 Lakh Crore

Web Summary : Indian stock markets faced turmoil last week, with top companies losing over ₹2 lakh crore in market capitalization. TCS and Reliance were hit hardest due to geopolitical tensions, weak IT results, and rising oil prices. Experts advise caution.