lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Air India : आता उधारी खातं बंद, सरकारी अधिकाऱ्यांनाही रोखीशिवाय तिकीट नाही

Air India : आता उधारी खातं बंद, सरकारी अधिकाऱ्यांनाही रोखीशिवाय तिकीट नाही

निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे एअर इंडियाने आपले उधारी खाते बंद केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 03:19 PM2021-10-30T15:19:24+5:302021-10-30T15:19:48+5:30

निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे एअर इंडियाने आपले उधारी खाते बंद केले आहे.

Clear all dues to Air India buy tickets in cash Centre to ministries departments | Air India : आता उधारी खातं बंद, सरकारी अधिकाऱ्यांनाही रोखीशिवाय तिकीट नाही

Air India : आता उधारी खातं बंद, सरकारी अधिकाऱ्यांनाही रोखीशिवाय तिकीट नाही

मुंबई : निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे एअर इंडियाने आपले उधारी खाते बंद केले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि विविध खात्यांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आता रोख रक्कम दिल्याशिवाय विमानाचे तिकीट मिळणार नाही.
सरकारी मालकीची विमान कंपनी असलेल्या एअर इंडियामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अधिकाऱ्यांना विशेष सवलत होती. मंत्रालयाच्या अधिकृत पत्राद्वारे त्यांना विमान प्रवास करता येत होता. 

केंद्रीय मंत्रालयाच्या विविध खात्यांचे मिळून जवळपास ३४ कोटी रुपये थकीत असल्याची बाब एअर इंडियाने अर्थमंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर उधारीवर एअर इंडियाचा प्रवास बंद करण्याचे आदेश अर्थमंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालयांना जारी केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आधीचा नियम काय?
अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने २००९ मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, सरकारी अधिकाऱ्यांना ‘एलटीसी’चा लाभ हवा असेल तर केवळ एअर इंडियाने प्रवास करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांचा समावेश होता. हा प्रवास खर्च केंद्र सरकारकडून उचलला जात असे. मात्र, आता पुढील आदेशपर्यंत रोख रक्कम देऊन तिकीट खरेदी करावे लागणार आहे.

Web Title: Clear all dues to Air India buy tickets in cash Centre to ministries departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.