भंडाऱ्यात ७६० कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट; ३५८ कोटींचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:56 IST2025-06-23T15:55:10+5:302025-06-23T15:56:31+5:30
Bhandara : ३३९.९४ कोटींचे कर्ज वितरण करून सहकारी बँक यंदाही आघाडीवर

Crop loan target of Rs 760 crores in Bhandara; Disbursement of Rs 358 crores
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगाम २०२५-२६ साठी भंडारा जिल्ह्यातील १ लाख १० हजार ८० शेतकऱ्यांना एकूण ७६०.३३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत ५८ हजार २१० शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत एकूण ३५८.६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्ज वितरणात यंदाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बाजी मारली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ५६ हजार ४७४ शेतकऱ्यांना ३३९.९४ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. राष्ट्रीयीकृत बँकांना मागे टाकत जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदाही आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात बँक खातेदार शेतकऱ्यांची एकूण संख्या १,१०,०८० इतकी आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे खातेदार, राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार, ग्रामीण बँकांच्या व अन्य बँकांच्या खातेदारांचा समावेश आहे. सध्या स्थितीत खरीप हंगामासाठीचे पीक कर्जवाटप सुरळीत आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच कर्जवाटप होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यंदाचे बँकनिहाय कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
यंदा १,१०,०८० खातेदार शेतकऱ्यांना एकूण ७६०.३३ कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. हे उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा सहकारी बँकांना ४८४.५८ कोटींचे, राष्ट्रीयीकृत बँकांना २४१.१२ कोटींचे, ग्रामीण बँकांना ३४.४३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
गत वर्षातील पीक कर्ज वितरणाची कामगिरी
सन २०२४-२५ या वर्षात जिल्हा बँकांनी ७८,४२० शेतकऱ्यांना ४२१.२६ कोटींच्या पीक कर्जाचे वितरण केले होते. राष्ट्रीयकृत बँकांनी ९,२६१ शेतकऱ्यांना १०९.३२ कोटी रुपये, ग्रामीण बँकांनी ३,६२३ शेतकऱ्यांना ३६.६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले होते.
आतापर्यंत केलेले कर्जवाटप
जिल्हा बँकेने ५६,७७४ शेतकरी सभासदांना ३३९.९४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी १,७३६ शेतकऱ्यांना १८.७१ कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकांनी ४ हजार ९४३ शेतकऱ्यांना ३४.६३ लाख रुपयांचे उद्दिष्ट असूनही अद्याप एकही कर्ज वाटप केले नसल्याची माहिती आहे.
यंदा पीक कर्ज वितरण वाढणार काय ?
खरीप हंगाम २०२४-२५ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ७८३.१४ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.