Chanakya Neeti: मोठमोठ्या धनिक, शेठजींनाही कंगाल बनवतात या चुका, तुम्हीही वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-02-07 10:59:21 | Updated: February 7, 2023 10:59 IST

Chanakya Neeti: पैसे कमावण्याबाबत चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्यांनी नीतीशास्त्रामध्ये त्या गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Open in app

आचार्य चाणक्य हे एक राज्यशास्त्रज्ञ, नीतिशास्त्रतज्ज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी सांगितलेल्या चाणक्यनीतीमध्ये व्यक्तीला जीवन सरळ आणि सुखाने जगण्याचा सल्ला दिला आहे. पैशांची बचत करण्यासाठी पैसे कमावण्याबाबत चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्यांनी नीतीशास्त्रामध्ये त्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे मोठमोठे धनिकही काही दिवसांत गरीब होऊ शकतात. या गोष्टींबाबत खबरदारी घेतल्यास लक्ष्मी मातेची कृपा कायम राहील. या तीन गोष्टी खालील प्रमाणे. 

धन चुकीच्या ठिकाणी गुंतवणे 
आचार्च चाणक्य यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार काही लोक धनाचा वापर हा कुटुंबीयांचे पालनपोषण आणि इतरांचे कल्याण आणि दानधर्माच्या कार्यामध्ये करतात. त्यामधून बचत आणि पु्ण्य मिळवणे आणि गुंतवणुकीतून भविष्य़ सुरक्षित करणे हा हेतू असतो. मात्र अनेकदा लोक पैशांचा वापर चुकीच्या ठिकाणी करतात. जुगार, सट्टा, मद्य आदींमध्ये पैसे गुंतवणे चुकीचे मानले गेले आहे. या गोष्टीसाठी पैशांचा वापर करणे व्यक्तीला हळुहळू गरीब बनवते. 

चुकीच्या मार्गाने पैसे कमावणारे
 चाणक्य सांगतात की, माता लक्ष्मी त्याच्याकडेच टिकते जो प्रामाणिक मेहनतीने पैसे कमावतो. तर चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्यांकडे लक्ष्मी माता फार दिवस थांबत नाही. जुगार, नशा, कुणालाही त्रास देण्याच्या इराद्याने केलेले कामामध्ये गुंतवलेल्या पैशांमुळे माता लक्ष्मी लवकर क्रोधित होते आणि त्या व्यक्तीला कायमस्वरूपी सोडून जाते. अशा परिस्थिती त्या व्यक्तीला कंगालीचा सामना करावा लागतो.  

वायफळ खर्च करणारे लोक 
काही लोकांचा स्वभाव उधळा असतो. ते जेवढा पैसा कमावतात. तेवढा ते वायफळ खर्च आणि आपली हौसमौज भागवण्यासाठी खर्च करतात. बचतीच्या नावावर त्यांच्याजवळ काहीच असत नाही. अशी व्यक्ती भविष्यामध्ये खूप त्रासांचा सामना करते. माता लक्ष्मी अशा लोकांजवळ फार काळ टिकत नाही.  

टॅग्स :पैसाफलज्योतिष
Open in App