Lok Sabha Election 2019: अहमदनगरमध्ये खासदार पुत्र सुवेंद्र गांधी यांची निवडणुकीत माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 20:34 IST2019-04-03T19:50:34+5:302019-04-03T20:34:58+5:30
भाजपाने खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारल्यानंतर पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंड पुकारले होते. निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी तयारी केली होती

Lok Sabha Election 2019: अहमदनगरमध्ये खासदार पुत्र सुवेंद्र गांधी यांची निवडणुकीत माघार
अहमदनगर : भाजपाने खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारल्यानंतर पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंड पुकारले होते. निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी तयारी केली होती. मात्र आज निवडणुकीतून माघार घेत असल्याची भुमिका त्यांनी जाहीर केली. वडील खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचेही सुवेंद्र गांधी यांनी सांगितले.
अहमदनगर लोकसभा मतदारंसघात भाजपने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यानंतर खासदार दिलीप गांधी नाराज झाले होते. गांधी समर्थकांनी मेळावा घेत अपक्ष निवडणुक लढविण्याची तयारी केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी गांधी परिवाराची भेट घेतली होती. त्यानंतरही खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्यासाठी अविनाश साखला यांनी उमेदवारी अर्ज नेला होता. या सर्व हालचालीनंतर सुवेंद्र गांधी यांनी निवडणुकीत माघार घेण्याची भुमिका जाहीर केली. त्यामुळे आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ.सुजय विखे विरूध्द राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अशी दुहेरी लढत रंगणार आहे.
मी भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ता आहे . त्यामुळे अनेक पदांवर काम करता आले. वडील खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व जिल्ह्यात पक्षाचे काम केली. मात्र 1999 गांधींना जिल्हाध्यक्षपदासाठी डावलले, 1996 ला लोकसभेसाठी डावलले, 1999 नाही मोठा संघर्ष केल्याने भारतीय जनता पार्टी चे तिकीट मिळाले व लोकसभे च्या निवडणुकीत दिलीप गांधी विजयी झालले. मात्र परत 2004 ला लोकसभेचे तिकीट कापले. असा सतत्याने दिलीप गांधींवर पक्षाकडून अन्याय झाला असला तरी खासदार दिलीप गांधी यांनी पक्षनिष्ठा कणभरही कमी केली नाही .शहरात व जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष काढून पक्षाला सुवर्ण दिवस आणले . शहर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षात सर्वात जास्त उपक्रम राबवले. मतदारसंघाच्या विकासासाठी ही केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांच्या विकास निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला . पक्षाने सांगितले व दिलेले सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबविले तरीही आताच्या लोकसभेसाठी खासदार गांधींचे तिकीट कापून अन्याय केला. असे असतानाही 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या मेळाव्यात मी भारतीय जनता पार्टीचे काम करणार व पक्षाचा उमेदवार विजयी करणार असे मेळाव्यात घोषणाही केली होती. तरीही भाजपाचे उमेदवाराकडून वरिष्ठ खासदार म्हणून अद्याप उचित सन्मान मिळाला नाही. म्हणून मी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी करणार असे जाहीर केले होते. मात्र, दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे स्वतः घरी येऊन मला उमेदवारी न करण्याची विनंती केली . मात्र तरीही मी माझे तालुक्यांमध्ये संपर्क दौरा चालू ठेवले. दोन दिवसापूर्वी पक्षाचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक व मंत्री राधाकृष्ण विखे हे पुन्हा घरी आले .पुन्हा विनंती केली .माझे वडील खासदार दिलीप गांधी यांनीही ही पहिल्या दिवशी मला उमेदवारी न करण्याचे सूचना केल्या होत्या .मी माझ्या आई-वडिलांचा ऐकणारा मुलगा आहे .म्हणून मी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शहर भारतीय जनता पार्टीचे संघटनमंत्री संघटन सरचिटणीस किशोर श्रीकांत साठे आदींसह शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.