Join us

बटाटे उकडताना ९० टक्के घरात 'ही' चूक करतात; म्हणूनच बटाट्यातलं पोषण नष्ट होऊन वजन वाढतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 11:48 IST

Proper Method Of Boiling Aloo: बटाटे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने उकडले तर त्याच्यामुळे त्याच्यातलं पोषण नष्ट होतं. तुमच्याघरी नेमके कोणत्या पद्धतीने बटाटे उकडले जातात? (90 percent women makes common mistakes in boiling potato or aloo)

ठळक मुद्देया पद्धतीने बटाटे उकडायला ५ ते ७ मिनिटांचा वेळ जास्त लागतो. पण बटाट्यातल्या पौष्टिक घटकांचा पुरेपूर लाभ तुमच्या शरीराला होतो. 

बटाट्याची भाजी हा बहुतांश लहान मुलांचा अतिशय आवडीचा पदार्थ. शाळेच्या डब्यात बटाट्याची भाजी दिसली की मुलं अतिशय खुश होतात आणि आवडीने सगळा डबा फस्त करतात. पुरी आणि बटाट्याची भाजी, मसाला डोसा, बटाट्याचे पराठे हे पदार्थ मुलांसकट घरातल्या सगळ्यांच्याच आवडीचे. शिवाय कित्येक भाज्यांमध्ये उकडलेला बटाटा अगदी सहज घातला जातो. पण बटाटे उकडण्याची तुमची पद्धत जर चुकत असेल तर त्यामुळे बटाट्यातून मिळणारं सगळं पोषण नष्ट होऊ शकतं आणि बटाटा फक्त तुमचं वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो (correct method of boiling aloo). म्हणूनच तुमच्या घरीही चुकीच्या पद्धतीने तर बटाटे उकडले जात नाहीत ना हे एकदा तपासून घ्या...(90 percent women makes mistakes in boiling potato or aloo)

 

बटाटे उकडण्याची योग्य पद्धत कोणती?

अनेक घरांमध्ये जेव्हा बटाटे उकडले जातात तेव्हा ते कुकरच्या डब्यामध्ये ठेवले जातात. कुकरच्या तळाशी आणि कुकरच्या डब्यातही पाणी घातले जाते आणि त्या पाण्यात बटाटे उकडले जातात. 

लाकडी चॉपिंग बोर्ड पिवळट- काळा पडला? २ पद्धतींनी करा स्वच्छ, नव्यासारखा चकाचक होईल

बटाटा आकाराने मोठा असेल तर बटाट्याचे अर्धे तुकडे केले जातात आणि ते पाण्यात घालून उकडले जातात. 

या पद्धतीने जर बटाटे उकडले तर बटाट्यातले जे काही पौष्टिक घटक असतात ते पाण्यामध्ये मिसळतात. हे पाणी आपण टाकून देतो. त्यामुळे त्या पाण्यासोबतच बटाट्यातले पौष्टिक घटकही वाया जातात.

 

म्हणूनच आता बटाटे उकडण्याची ही अचूक पद्धत बघा. यासाठी कुकरच्या तळाशी पाणी घाला. त्यामध्ये कुकरचा डबा ठेवा आणि त्या डब्यामध्ये बटाटे अर्धे अर्धे कापून ठेवा.

मुलांच्या पायाच्या बोटांवर साचलेला मळ काढून टाकण्यासाठी २ उपाय- काळवंडलेले पाय होतील स्वच्छ 

ज्या भांड्यात बटाटे ठेवले आहेत, त्या भांड्यात अजिबात पाणी टाकू नये. नुसते वाफेवर बटाटे उकडून घ्यावेत. त्यामुळे त्याच्यातले पौष्टिक घटक टिकून राहतात. या पद्धतीने बटाटे उकडायला ५ ते ७ मिनिटांचा वेळ जास्त लागतो. पण बटाट्यातल्या पौष्टिक घटकांचा पुरेपूर लाभ तुमच्या शरीराला होतो. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृतीबटाटावेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स