गोविंदा आला रे आला... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 06:22 PM2019-08-24T18:22:37+5:302019-08-24T18:30:35+5:30

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुंबईतील बहुतांश भागात यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत नाही

दहीहंडी उत्सवात कही खुशी कही गम असं दृश्य दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूरग्रस्तांना मदत जमविण्याचं काम सुरूय

मनसेच्या वतीने ठाण्याती पूरग्रस्त भागातील नागरिकांना दहीहंडीच्या व्यासपीठावर बोलावण्यात आले, तसेच या कुटुंबीयांना घर बांधून देण्याचं वचनही देण्यात आलं.

दहीहंडीचा उत्साह कायम आहे, पण मनामध्ये कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त बांधवांसाठी एका कोपऱ्यात दु:खाचा पूर दिसून येतोय

ठाण्यातील दहीहंडी उत्सावात एका पथकाने पंढरीच्या पांडुरंगालाही आणलं होतं. विठ्ठलाचे ते रुप अधिकच मनमोहक होते

भाजपाकडूनही दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे, पण अरुण जेटलींच्या निधनानंतर अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. अतिशय साधेपणाने हा दहीहंडी उत्सव साजरा केला